Shivsena : सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितले, औरंगाबादकरांनो पाण्यासाठी दोन वर्ष वाट पहा..

कंत्राटदारांकडून होणारी अडवणूक हे कारण सांगत पाणीपुरवठा योजनेच्या कामाला होणाऱ्या विलंब सरकारमुळे नाही हे देखील सांगण्याचा देसाई यांनी प्रयत्न केला. (Subhash Desai)
Guardian Minster Subhash Desai
Guardian Minster Subhash DesaiSarkarnama

औरंगाबाद : शहवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर खरंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादेत (Aurangabad) सभा घेतली. भाजपने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात काढलेला जन आक्रोश मोर्चा आणि त्तपुर्वी स्थानिक नेत्यांनी पाणीप्रश्नावर सुरू केलेले आंदोलन यानंतरच खऱ्या अर्थाने महापालिका, पालकमंत्री आणि राज्य सरकार हलले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

महापालिकेच्या सत्तेत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसलेली भाजप शहरातील पाणी प्रश्नाचे खापर शिवसेनेच्या (Shivsena) माथी मारून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत असले तरी येणाऱ्या निवडणुकीत नागरिक त्यांना जाब विचारल्याशिवाय देखील राहणार नाही. परंतु १५-२० वर्ष एकहाती सत्ता असूनही या दोन्ही पक्षांनी नागरिकांना पुरेसे पाणी देता आले नाही ही वस्तुस्थिती आहे.

आता जेव्हा प्रयत्न सुरू केले तर त्याला देखील खूप उशीर झाला आहे. नवी पाणीपुरवठा योजना पुर्ण व्हायला किमान दोन ते अडीच वर्षांचा कालवधी लागणार आहे. शिवसेनेकडून पाण्याची ओरड काहीसी कमी करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू असले तरी ते फाटलेल्या आभाळाला थिगळ लावण्यासारखेच ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या स्वाभीमान सभेत पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी स्पष्टच सांगितले, की मुबलक पाणी मिळायला दोन वर्ष लागतील. कारण ही योजना खूप मोठी आहे.

पाणी प्रश्नावरून जेव्हा भाजपने आंदोलन सुरू केले, फडणवीसांनी जल आक्रोश मोर्चा काढत महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेवर आरोप केले, तेव्हा याने पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असा एक सूर एमआयएम व इतर पक्षांनी लावला होता. मोर्चा आणि फडणवीसांच्या भाषणाने पाणी मिळणार असेल तर आपण देखील मोर्चात नागरिक म्हणून सहभागी होऊ, असे आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी दिले होते. आज ही वस्तुस्थीती एका अर्थाने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यच केली. शिवाय कंत्राटदारांकडून होणारी अडवणूक हे कारण सांगत पाणीपुरवठा योजनेच्या कामाला होणाऱ्या विलंब सरकारमुळे नाही हे देखील सांगण्याचा देसाई यांनी प्रयत्न केला.

Guardian Minster Subhash Desai
..ना संभाजीनगरची घोषणा, ना पाणी प्रश्नावर ठोस उत्तर ; `स्वाभीमान` सभेतही औरंगाबादकरांची झोळी रिकामीच...

बजाज कारखाना औरंगाबादेत आला आणि केवळ शहराचाच नाही तर मराठावाड्याचा कायापालट झाला, असाच आणखी एक आंतरराष्ट्रीय उद्योग आम्ही या शहरात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे सांगत देसाई यांनी दोवासमधून उद्योगमंत्र्यांनी शहरासाठी काय आणले ? या प्रश्नाला उत्तर दिले. एकंदरित पाणी प्रश्नावर आता कुणी कितीही आंदोलनं केली, मोर्चे काढले तरी औरंगाबादकरांना पाण्यासाठी दोन वर्ष प्रतिक्षा करावी लागणार एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com