ST कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेच्या आमदाराचा पुढाकार ; मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंगोलीत आगारातील तीनशे एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन सादर करून स्वइच्छा मरणाची परवानगी मागत टोकाची भूमिका घेतली आहे.
Santosh Bangar
Santosh Bangarsarkarnama

हिंगोली : राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) सुरुच आहे. गेल्या दोन महिन्यांनापेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या संपावर अद्याप देखील तोडगा निघालेला नाही. या संपात आता शिवसेनेच्या आमदारांनेच उडी घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हिंगोलीत आगारातील तीनशे एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन सादर करून स्वइच्छा मरणाची परवानगी मागत टोकाची भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेनंतर आता परिवहन खाते असलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी देखील सरकार विरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी या संदर्भात थेट राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लेखी पत्र लिहिले आहे.

एसटी संपातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये तातडीने समाविष्ट करण्याची मागणी केली बांगर यांनी केली आहे. आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले लेखी पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विरोधी पक्ष व सत्ताधारी आमदार हे विलीनीकरणाच्या बाजूने असताना केवळ परिवहन मंत्री व मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात 63 एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत तुटपुंजी पगार मिळत असल्याने आर्थिक विवंचनेतून आपले जीवन संपवले आहे, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून या मागण्यांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, असे नमूद केले आहे.

Santosh Bangar
शिरूरचे माजी खासदार आढळरावही झाले कोरोना पॉझीटीव्ह

राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) अजूनही सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. या वर तोडगा म्हणून आता महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. सुमारे तीन हजार कंत्राटी चालक सरकार नेमणार असून 400 कंत्राटी चालकांची नियुक्ती होणार आहे.

Santosh Bangar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अखेर रद्द

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com