औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. या सभेची जय्यत तयारी झाली असून मैदान देखील सजले आहे. आता (Raj Thackeray) राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणाचा आणि कसा समाचार घेतात ? याची उत्सूकता सगळ्यांना लागलेली असतांना शिवसेनेने (Shivsena) मात्र मनसेच्या सभेला पैसे देऊन माणसं आणली जात असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी हा आरोप करतांना तुम्ही कितीही माणसं आणा एक नाही पाच लाखांच्यी सभा घ्या, त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. (Marathwada) औरंगाबाद हा शिवसेनाचा गड आहे आणि तो भक्कमच राहणार, अशा शब्दात मनसेवर टीका केली. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजत शासकीय ध्वजवंदनानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी राज ठाकरे यांच्या सभेवर भाष्य केले.
खैरे म्हणाले, मला जिल्हाभरातून फोन येत आहेत. पाचशे रुपये, चहा नाश्ता देवून लोकांना सभेला बोलावण्यात येत आहे. पैसे देऊन सभेला येणाऱ्या लोकांमुळे शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा हा गड आहे, या गडाला धक्का देणे मनसेच काय कोणत्या पक्षाला शक्य होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी भाजपकडून मदत केली जात आहे हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे अशा कितीही सभा घेतल्या तरी शिवसेनेला त्याने काही फरक पडणार नाही. एक नाही तर पाच लाख लोक जरी सभा ऐकायला आले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. शिवसेनेच्या गडाला धक्का देण्याची कुणातही हिमंत नसल्याचेही खैरे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.