Sharad Pawar : बजेटपेक्षा मागण्याच जास्त होतात, म्हणून मी शिक्षण मंत्रीपद सोडलं होतं..

लोकसभेच्या सदस्याला सहा मतदारसंघासाठी जेवढा निधी मिळतो, तेवढा निधी आपल्या अर्थमंत्र्यांनी समाजात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देण्याचा निर्णय घेतला याबद्दल आनंद वाटतो. (Sharad Pawar)
Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad PawarSarkarnama

औरंगाबाद : राज्यात शिक्षण मंत्री म्हणून काम करण मोठ अवघड काम आहे. मी काही वर्षच राज्यात शिक्षण मंत्री होतो, तेव्हा शिक्षक संघटनांचे नेते, पदाधिकारी माझ्याकडे यायचे. हा निर्णय तसा घ्या, तो निर्णय असा घ्या, असं ते मला सांगायचे. मी विचार करायचो राज्यात शिक्षक किती, त्यांना या निर्णयाचा किता फायदा होईल आणि तिजोरीवर किती भार पडले. (Sharad Pawar) मग असं लक्षात यायंच की जेवढं शिक्षण खात्याच बजेट नाही, त्यापेक्षा अधिक मागण्या व्हायच्या. त्यामुळे शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांना मंत्रीमंडळात घ्यायचे असेल तर मला शिक्षाणाऐवजी कृषी खाते द्या, अशी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केल्याची आठवण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Ncp) यांनी सांगितली.

शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या वतीने आयोजित पुस्तक वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते. त्यांच्या या आठवणीवर सभागृहात उपस्थितीत सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. (Aurangabad) पंधरा मिनिटांचा वेळ मागून विक्रम काळेंनी एका तासाचा कार्यक्रम घेतला, त्यामुळे त्यांचे गणित कच्चे असल्याचा चिमटा देखील पवारांनी यावेळी काढला. आमदार विक्रम काळे यांच्या निधीतून शाळांच्या ग्रंथालयांसाठी पुस्तके देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाची सुरूवात आज शरद पवार यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करून करण्यात आली. यावेळी पुस्तकांमधून ज्ञान वाढते, त्यामुळे विक्रम काळे यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत पवार यांनी विक्रम काळे यांचे कौतुकही केले. यावेळी शरद पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना मिळणाऱ्या निधींचा वापर हा योग्य ठिकाणी झाला पाहिजे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदरांना ५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला.

Ncp Leader Sharad Pawar
Aurangabad : जमावबंदी आदेश सभेमुळे काढलेला नाही ; वर्षभर असे आदेश असतात..

लोकसभेच्या सदस्याला सहा मतदारसंघासाठी जेवढा निधी मिळतो, तेवढा निधी आपल्या अर्थमंत्र्यांनी समाजात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना देण्याचा निर्णय घेतला याबद्दल आनंद वाटतो. सरकारमध्ये खाली काम करणाऱ्या सदस्यांना जनतेची काम करण्यासाठी निधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली. आपल्या मिळणाऱ्या निधीचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे.

विक्रम काळे यांनी पुस्तक वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे, यातून ज्ञानार्जनाचे काम होईल, त्यामुळे असेही उपक्रम राबवले पाहिजे, असेही पवार म्हणाले. विक्रम काळे यांनी आपल्या भाषणात आज एवढ्या मागण्या केल्या आहेत, की अर्थमंत्र्यांना आज कोही झोप लागणार नाही, अशी मिश्किल टप्पणी देखील पवार यांनी भाषणाच्या शेवटी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com