'मी पुन्हा येईन म्हणता, पण आम्ही येऊ द्यायला पाहिजे ना'- शरद पवार

Sharad Pawar news आता उरलेलं आयुष्य तुमच्या, राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे हा निर्धार केला आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsTwitter/ @SharadPawar

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकांच्या आधीच ‘ मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे म्हणणाऱ्यांना नेत्यांना अजूनही जनतेचा अंदाज आलेला नाही. ‘मी येणार, मी येणार’, असे तुम्ही म्हणत असलात तरी आम्ही तुम्हाला येऊ द्यायला पाहिजे ना, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना लगावला. उस्मानाबाद येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. (Sharad Pawar latest news)

राजमाता जिजाऊंच्या खंबीर साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा जागर घातला. सावित्रीबाईंचाही शिक्षण क्षेत्रात मोलाचा वाटा होता. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही माता रमाईंची खंबीर साथ मिळाली. याच महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून आजपर्यंत आम्ही वाटचाल केली आहे. पण काहीजण मात्र या महापुरुषांचा अवमान करत आहेत. हे मनाला पटत नाही, असे म्हणत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टोला लगावला.

Sharad Pawar News
मोदी, अखिलेश यादव यांच्या मतदारसंघासह ५४ जागांसाठी मतदान सुरु

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या आणि युवती काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या सर्कलमधील विविध विकास कामांच्या उद्धाटन आणि लोकार्पणासाठी शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा आणि राज्यातील जनतेने आपल्याला काही कमी केले नाही, असे सांगत उर्वरित आयुष्य आता तुमच्या सेवेतच घालवणार असल्याचे सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्याने नेहमीच मला साथ दिली, राज्यातील जनतेने देखील भरभरून दिले. या राज्याचा एकदा नाही तर चारवेळा मुख्यमंत्री झालो, कधी कुणी झालं होत का? विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा अशा सगळ्या सभागृहात तब्बल ५२ वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं. आता आणखी काय पाहिजे? म्हणून आता उरलेलं आयुष्य तुमच्या, राज्याच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी काम करत राहायचे हा निर्धार केला आहे.

मगाशी कुणी तरी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला, मी ८२ वर्षांचा झालो, म्हातारा झालो, पण यांना काय माहित मी काय काय करू शकतो. मी अजून थकलेलो नाही, त्यामुळे तुमची साथ असेपर्यंत मी हे राज्य समृध्द करण्यासाठी काम करत राहीन. जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्ना संदर्भात मी आताच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोललो. त्यांनी देखील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निविदा काढल्याचे सांगून येत्या दोन-तीन महिन्यात काम सुरू होईल असे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com