औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅरर्पोरेशन लिमिटेड कंपनी औरंगाबाद व महानगरपालिकेच्या ( Aurangabad) पुढाकारातून शहरातील ऐतिहासिक खाम नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले. (Bjp) या अंतर्गत अनेक उद्याने, फुलांच्या बागा, सरोवर निर्माण करून त्यास राजकीय नेत्यांनी नावे देण्यात आली. (Mla Atul Save) महापालिका आयुक्तांच्या या निर्णयाबद्दल शहरवासियांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, एमआयएम अशा सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेते, लोकप्रतिनिधींची नावे वेगवेगळ्या उपक्रमांना देण्यात आली होती. यावरून लोकप्रतिनिधी व महापालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर आता काही लोकप्रतिनिधी आपले नाव हटवण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी या संदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून आपल्या नावाने असलेल्या अतुल बाल उद्यानाला आपले नाव देण्यास विरोध दर्शवला आहे.
माझ्या नावाऐवजी पर्यावरणासाठी झटणाऱ्या, समाजसुधारक, विचारवंत किंवा महापुरूषाचे नाव या उद्यानाला द्यावे, असे सावे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. सावे म्हणतात, खाम नदी पुनरुज्जीवनासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, व शेकडो औरंगाबादकर राबले आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच हा प्रकल्प आता दर्शनीय स्वरूपाचा झाला आहे. या खाम नदी काठच्या विकसित केलेल्या विविध प्रकल्पांना राजकीय नेत्यांची नावे दिली आहेत.
यामध्ये माझ्या नावाने अतुल बाल उद्यान तयार केले आहे, त्यास माझा विरोध असून, माझ्या नावाने सुरू केलेल्या या उद्यानास थोर विचारवंत, महात्मे, विकासपुरुष, समाजसुधारक, संत, स्वातंत्र्यसेनानी किंवा पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या विकास पुरुष यातील कोणाचेही नाव देण्यात यावे. यासाठी महापालिका प्रशासक व मुख कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी यांना आपण पत्र पाठवले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.