Shivsena : रावसाहेब वीस वर्षापासून खासदार, लोणीकर पाणीपुरवठा मंत्री होते, मग त्यांनी काय केले ?

देशातील टाॅप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे प्रथम क्रमांकावर आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या सर्टफिकेटची त्यांना गरज नाही. (Shivsena, Aurangabad)
Mla Ambadas Danve-Minister Raosaheb Danve-Lonikar
Mla Ambadas Danve-Minister Raosaheb Danve-LonikarSarkarnama

औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून रावासहेब दानवे वीस वर्षापासून निवडून येतात, ते सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत. (Shivsena) त्यांच्याच जिल्ह्यातील भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पाच वर्ष पाणीपुरवठा मंत्री होते, मग जालनेकरांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी काय केले ? असा सवाल शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी केला.

सोलापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालन्यात काढण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चावर भाष्य केले. (Jalna) या मोर्चाला संबोधित करतांना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा समाचार देखील दानवे यांनी घेतला.

अंबादास दानवे म्हणाले, रावसाहेब दानवे हे वीस वर्षापासून खासदार आहेत, बबनराव लोणीकर युती फडणवीसांच्याच मंत्रीमंडळात पाणीपुरवठा मंत्री होते. एवढे असूनही जर भाजपला जल आक्रोश मोर्चा काढावा लागत असेलत तर या नेत्यांनी इतकी वर्ष काय केले ? हा खरा प्रश्न आहे. मग फडणवीसांनी तेव्हा जालन्यात पाण्यासाठी मोर्चा का काढला नाही ? त्यामुळे जालनेकरांना आज जे पाणी मिळत नाहीये, त्याला महाविकास आघाडी सरकार नाही, तर भाजपचे जिल्ह्यातील नेतेच जबाबदार आहेत.

Mla Ambadas Danve-Minister Raosaheb Danve-Lonikar
मलिकांसह जैन यांचं मंत्रिपदही जाणार? भाजप नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

मी सोलापूर जिल्ह्यात आहे, या शहरात नऊ दिवसांनी पाणी येते. इथेही भाजपचा खासदार, दोन आमदार व मंत्री होते, मग इथेही फडणवीस पाण्यासाठी मोर्चा काढणार का ? हा माझा त्यांना सवाल आहे. राज्याचे मुख्यमंत्री फक्त कार चालवतात, सरकार रामभरोसे सुरू आहे, या फडणवीसांच्या टीकेकडे लक्ष वेधले असता, दानवेंनी त्यालाही प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कारही चालवतात आणि सरकारही उत्तम पद्धतीने चालवत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल देश आणि जागतिक पातळीवर घेतली गेली. देशातील टाॅप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे प्रथम क्रमांकावर आहेत, त्यामुळे फडणवीस यांच्या सर्टफिकेटची त्यांना गरज नाही, असा टोला देखील अंबादास दानवे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com