Bjp : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या `परीक्षा पे चर्चा` अभियानांतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षेच्या बाबतीत असलेली मनातील भिती आणि तणाव कसा घालवायाचा? याचे धडे देखील दानवे यांनी विद्यार्थ्यांना दिले.
परीक्षा नुसता शब्द ऐकला तरी घाम फुटतो, हीच विद्यार्थ्यांच्या मनातली भीती आणि तणाव दूर करण्यासाठी 'परीक्षा पे चर्चा' अभियानांतर्गत (Jalna) जालना येथील सरस्वती भूवन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी (Bjp) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रावसाहेब दानवे यांनी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी आयोजित केलेले अभियान यशस्वी ठरत असून यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित होतो आहे. या प्रसंगी सर्व मुलांना ' एक्झाम वाॅरियर्स` व `परीक्षा पे चर्चा या पुस्तिकेचे वितरण देखील करण्यात आले.
परीक्षेचा ताण न घेता मोकळ्या मनाने समोर जा, असे आवाहन दानवे यांनी यावेळी केले. केंद्र सरकारच्या वतीने देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात कुठल्या गोष्टी कराव्यात, टाळाव्यात जेणेकरून परीक्षेची भिती न वाटता ती देतांना उत्साह आणि आनंद वाटेल, या संदर्भात या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रा. किरण पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.