Raosaheb Danve : सगळे राजकीय पक्ष मिळून आम्हाला रोखू शकले नाहीत ..

Bjp : संजय राऊत हे अजून बेदाग ठरलेले नाहीत, त्यांना फेब्रुवारीत कुठे जावे लागेल हे त्यांना देखील माहित नाही.
Bjp Leader Raosaheb Danve News, Aurangabad
Bjp Leader Raosaheb Danve News, AurangabadSarkarnama

Grampanchayat Reaction : राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा Bjp भाजप हाच नंबर एकचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी, काॅंग्रेस, उद्धव ठाकरेंची सेना हे व इतर राजकीय पक्ष मिळून देखील आम्हाला रोखू शकलेले नाहीत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत देखील आम्ही यापेक्षा जास्त यश मिळवू, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

Bjp Leader Raosaheb Danve News, Aurangabad
Jalna News: मोठा साखर कारखानदार भाजपच्या गळाला, राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न?

काल निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने राज्यात आमचाच पक्ष नंबर एकचा ठरल्याचा दावा केला. यावर प्रतिक्रिया देतांना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील सगळे राजकीय पक्ष एकीकडे आणि भाजप-बाळासाहेबांची शिवसेना एकीकडे असे चित्र दिसले. राज्यात शिंदे गटाच्या देखील जागा वाढल्याचा दावा त्यांनी केला. (Bjp)

रावसाहेब दानवे म्हणाले, राज्यातील सत्तातंरानंतर भाजप आणि शिंदे गटाबद्दल रोष असल्याचे वातावरण विरोधकांनी तयार केले होते. पण ते किती खोटे होते हे कालच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. यापुढील निवडणुकांमध्ये देखील हेच चित्र दिसेल असा मला विश्वास आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या साथीने आम्ही येणाऱ्या सगळ्या निवडणुकांजिंकून दाखवू.

ग्रामपंचायत निवडणुकीतील दावे खरे नसतात, तिथे पक्ष नसतात असे जरी सांगितले जात असले तरी निवडणुका संपल्या की गावातले सरपंच, सदस्य हे कुठल्या न कुठल्या पक्षाशी जोडले जातात. या माध्यमातून ते गावाचा विकास करून घेतात, वाद विसरून एकत्र येतात ही वस्तुस्थिती आहे. शिवाय निवडणुकीत पॅनलच्या बॅनरवर ते आपल्या नेत्याचे फोटो लावतात त्यावरून तो कोणत्या पक्षाच्या विचारांशी बांधील आहे ते लक्षात येते.

माझ्या जालना लोकसभा मतदारसंघात सगळ्या पक्षांनी मिळून जेवढ्या ग्रामंपचायती, सदस्यांच्या जागा जिंकल्या तेवढ्या एकट्या भाजपने जिंकल्या असल्याचा दावा देखील दानवे यांनी केला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे फेब्रुवारी महिन्यात दिसणार नाही, असा इशारा दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता दानवेंनी त्यांची खिल्ली उडवली.

संजय राऊत हे अजून बेदाग ठरलेले नाहीत, त्यांना फेब्रुवारीत कुठे जावे लागेल हे त्यांना देखील माहित नाही. ते पुढच्या निवडणुकीच्या काळात कुठे असतील हे त्यांना देखील माहित आहे का? असा टोला देखील दानवे यांनी राऊतांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com