परभणी : राज्यात व मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे, जनावरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Farmers) पण जे सरकार टिकेल की नाही याची शाश्वती सत्तेत बसलेल्यांनाच नाही असे सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. (Raju Shetty)
पण माझे सरकारला सांगणे आहे, की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला तर गाठ (Parbhani) आमच्याशी आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
परभणीत शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. शेट्टी म्हणाले, संपूर्ण परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातलं आहे, पिके नष्ट झाली आहे.
असे असताना ही सरकारने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाहीये. हे सरकार म्हणजे कोर्टाच्या तारखेनुसार चालणारे सरकार आहे कि काय असे वाटायला लागले आहे.
सरकार मधल्या लोकांना सुद्धा आत्मविश्वास नाही की हे सरकार किती दिवस टिकेल. जिल्ह्याला पालकमंत्री अजून नेमलेले नाहीत. मग शेतकरी, सामान्य, कष्टकऱ्यांचे प्रश्न कसे सुटणार? असा सवाल देखील शेट्टी यांनी उपस्थितीत केला.
आधी सामान्य माणसावर अन्याय झाला की तो कोर्टात जाण्याची भिती दाखवायचा. पण आता कोर्टात सुद्धा न्याय मिळेल याची खात्री राहिलेली नाही, असा खोचक टोला देखील शेट्टी यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.