Rajaysabha : आमचं एकही मत फुटणार नाही, त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये..

अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून यावर आता पक्षाचा शिक्का बसला आहे. सत्ताधारी पक्षाला मानणाऱ्याचा ऊस गाळपासाठी नेला जातो, पण विरोधकाचा असेल तर तो जळण्यासाठी सोडून दिला जातो. (Devendra Fadanvis)
Bjp Leader Devendra Fadanvis
Bjp Leader Devendra FadanvisSarkarnama

लातूर : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार कायम ठेवल्याने चुरस वाढली आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा हा सामना रंगणार असून दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. (Bjp) या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत भाजपची मतं फुटणार ? कारण आमच्याच पक्षातले अनेक लोक तिकडे गेले आहेत, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय.

यावर आमचं एकही मंत फुटणार नाही, सगळ्याच पक्षात या-त्या पक्षातून आलेले लोंक आहेत. आमच्याकडे जे आले ते तिकडे वैतागले होते म्हणूनच आलेले आहेत. (Latur) त्यामुळे महाविकास आघाडीने दिवसा स्वप्न पाहू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला.

लातूर येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपकडून अपक्ष आमदरांवर ईडी. सीबीआयकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप केला जातोय. यावर कोण आहेत संजय राऊत ? ते का त्ववेत्ते आहेत का ? ते रोज उलटसुलट बोलत असतात, त्यावर मी उत्तर का द्यायचे, असेही फडणवीस म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच कलगितुरा सुरू आहे.

Bjp Leader Devendra Fadanvis
बिनबोभाट अवैध वाळू वाहतूकीसाठी दीड लाखाची लाच मागणारा तहसिलदार जाळ्यात..

या सदंर्भात प्रसार माध्यमांशी बोलतांना फडणवीस यांनी भाजपची मतं फुटणार नसल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले, मुंबई म्हणजे महाराष्ट्र असा आमच्या मुख्यमंत्र्यांचा समज झाला आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील शेतकऱ्यांशी काहीच देणं-घेणं राहिलेलं नाही. आपल सरकार असतांना पाऊस पडला तरी पैसे मिळायचे, नाही पडला तरी पैसे मिळायचे. पीक आले तरी पैसे, गेले तरी पैसे. पण गेल्या अडीच वर्षात या सरकारने शेतकऱ्यांना एक दमडीही दिली नाही.

मुख्यमंत्री सोलापूरला अतिवृष्टी काळात दौरा करायला आले होते. पण रेड कारपेटच्या खाली देखील उतरले नाही, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे काय होईल ? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला असून यावर आता पक्षाचा शिक्का बसला आहे. सत्ताधारी पक्षाला मानणाऱ्याचा ऊस गाळपासाठी नेला जातो, पण विरोधकाचा असेल तर तो जळण्यासाठी सोडून दिला जातो, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com