नगर - बीड मार्गावर रेल्वे धावली; श्रेय विलासराव देशमुख यांचेच..

विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या लोहमार्गासाठीचा ५० टक्के खर्च राज्य सरकारने उचलण्याचा ऐतिहासिक धोरणात्मक निर्णय घेतला. (Vilasrao Deshmukh)
Let.Vilasrao Deshmukh

Let.Vilasrao Deshmukh

Sarkarnama

बीड : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा व जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याच्या अहमदनगर - बीड - परळी लोहमार्गावरुन बुधवारी रेल्वे धावली. (Beed) याचे श्रेय तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचेच असल्याचे काँग्रेस (Congress) ओबीसी विभागाचे राज्य सचिव गणेश राऊत यांनी म्हटले आहे.

विलासराव देशमुख यांनी या बहुप्रतिक्षीत रेल्वेमार्गाच्या कामासाठी निम्मा खर्च राज्य सरकाद देणार, असा त्यावेळचा देशातील पहिला ऐतिहासिक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळेच या लोहमार्गाच्या कामाला गती आली असेही राऊत म्हणाले.

अहमदगर - बीड - परळी लोहमार्गाचा मुद्दा मागील ५० वर्षांपासून गाजत आहे. या लोहमार्गाबाबत जिल्ह्यात मोठे राजकारण आणि श्रेयवादही रंगला. अगदी या महामार्गाला मंजूरीपूर्वी भूमिपुजनांचे कार्यक्रम देखील झाले. कधीकाळी अडीचशे कोटींचा हा महामार्ग आता हजारो कोटींवर पोचला आहे.

दरम्यान, या लोहमार्गासाठी राजकीय नेत्यांसह सामान्यांनीही मोठे परिश्रम, लाठ्या - काठ्या खाऊन आंदोलने केली आहेत. बुधवारी या अहमदनगर - बीड - परळी लोहमार्गावरुन अहमदनगर ते आष्टी अशी ६१ किलोमीटर अंतरावर रेल्वे धावली. त्याचे श्रेय घेण्यासाठी कोणीही कोणतीच कसर सोडली नाही.

मात्र, या श्रेयवादाची लढाई रंगली असली तरी या लोहमार्गाचे खरे श्रय तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना व काँग्रेस सरकारला जाते, असा दावाही गणेश राऊत यांनी केला आहे. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या लोहमार्गासाठीचा ५० टक्के खर्च राज्य सरकारने उचलण्याचा ऐतिहासिक धोरणात्मक निर्णय घेतला.

<div class="paragraphs"><p>Let.Vilasrao Deshmukh</p></div>
माझ्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो ओवेसी मोदींचा कोण लागतो; त्याला ठोका..

पहिल्या पासून रेल्वे बोर्डातील तज्ञांनी हा मार्ग व्यवसायिक दृष्ट्या परवडनार नाही व आपला खर्च वाया जाऊ शकतो असा शेरा मारला होता. त्यामुळे केंद्र सरकार येवढा निधी खर्च करायला तयार नव्हते. मात्र, विलासराव देशमुख यांनी जिल्ह्यातील जनतेची भावना व प्रमुख नेत्यांची मागणी लक्षात घेऊन भरीव आर्थिक तरतूद केली.

देशात कोठेही राज्य सरकार लोहमार्गाच्या कामाला निधी देत नाही आणि हिस्सा उचलत नसताना फक्त काँग्रेस सरकार व विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा निर्णय झाल्याचे गणेश राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com