Osmanabad : ज्ञानराज चौगुलेच्या बंडाने धक्का, तर सावंताचा निर्णय अपेक्षितच..

चौगुले यांच्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कुठेही पद मिळाले नाही. त्यामुळेच चौगुले नाराज असल्याची चर्चा असून त्यांनी बंडाची भूमिका घेतली. (Shivsena)
Mla Dnyanraj Chaugule-Tanaji Sawant
Mla Dnyanraj Chaugule-Tanaji SawantSarkarnama

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनपैकी दोन आमदार नॉटरिचेबल आहेत. राजकीय भूकंपात उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील दोन आमदारांच्या नॉटरिचेबलने शिवसैनीकांची झोप उडाली आहे. त्यामध्ये तिसऱ्यांदा निवडूणआलेल्या ज्ञानराज चौगुले यांच्या नॉटरिचेबलने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची नाराजी लपून राहिलेली नाही, त्यामुळे त्यांचा निर्णय अपेक्षितच होता, अशी चर्चा होत आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. मागील तीन-चार निवडणुकीत आमदार, खासदारकी शिवसेनेकडे कायम आहे.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तीन आमदार आणि खासदार जिल्ह्याने शिवसेनेला (Shivsena) दिले आहेत. तरीही जिल्ह्यातील तीनपैकी दोन आमदार बंडामध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे ज्ञानराज चौगुले हे गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये आमदार म्हणून निवडूण आलेले आहेत. मात्र त्यांच्या वाट्याला मंत्रीपद येऊ शकले नव्हते.

दरम्यान आमदार चौगुले आणि प्रा. गायकवाड हे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा सेनेचे जिल्हाप्रमुखपद मागत होते. मात्र त्यावरही अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. माजी खासदार ज्येष्ठ नेते प्रा. रवींद्र गायकवाड यांचे आमदार चौगुले शिष्य म्हणून परिचित आहेत. आजही प्रा. गायकवाड यांना आमदार चौगुले हे आदरस्थानी मानतात. मात्र आमदार चौगुले यांच्या या निर्णयाला त्यांची संमती आहे की नाही, याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे.

प्रा. गायकवाड यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडेही शिवसैनिकांचे लक्ष असणार आहे. प्रा. गायकवाड यांचे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये खासदारकीचे तिकट कापले होते. त्यानंतर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना शिवसेनेने खासदारकीचे तिकीट दिले. यामुळे प्रा. गायकवाड हेही सेनेत नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे चौगुले यांच्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात कुठेही पद मिळाले नाही. त्यामुळेच चौगुले नाराज असल्याची चर्चा असून त्यांनी बंडाची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे.

Mla Dnyanraj Chaugule-Tanaji Sawant
Aurangabad : बालेकिल्ल्यातील सात पैकी पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत...

शिवाय चौगुले हे कायमच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. अयोध्या दौऱ्यानंतर चौगुले हे जिल्ह्यात फारसे फिरकले नाहीत. अखेर त्यांनी शिंदे यांच्या साथ सोडली नसल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे. दरम्यान आमदार चौगुले हे कायमच शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे चौगुलेंच्या बंडाने जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांना धक्का बसला आहे.

माजीमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये मंत्रीपद बहाल केले होते. यंदाच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांनी अनेकवेळा आमदार सावंत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पक्षश्रेष्टीकडूनही त्यांना यावर फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

शिवसेनेने भाजपसोबत जावे, असे जाहीर वक्तव्यही आमदार सावंत यांच्याकडून वारंवार येत होती. शिवाय जिल्हा परिषदेतही आमदार सावंत यांनी भाजपसोबत जावून सत्ता मिळविली. जिल्ह्यात कायमच शिवसेनेत अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला. याच परिस्थितीमुळे जिल्ह्यातील दोन्ही आमदार बंड्याच्या पवित्र्यात गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी मात्र सेनेसोबत राहत एकनिष्टता दाखविल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com