Congress Vs BJP : नाना पटोले म्हणाले, राज्यातील मंत्र्यांची मलाईदार खात्यासाठी लढाई चाललीय...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
Maharashtra Politcs| Nana Patole|
Maharashtra Politcs| Nana Patole| Sarkarnama

Congress Vs BJP : औरंगाबाद - राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार येऊन महिना झाला आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा दोन दिवसांपूर्वी विस्तारही झाला. अशा वेळी काँग्रेसतर्फे आजादी गौरव यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रे संदर्भात माहिती देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

नाना पटोले म्हणाले की, आजादी गौरव यात्रा ही देशभर सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 9 ऑगस्टला सेवाग्राम पासून ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. तेथे 8 ऑगस्टला महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलनाचे नियोजन केले होते. त्याच सेवाग्राम आश्रमातून आम्ही ही यात्रा सुरू केली. 9 ऑगस्टला महात्मा गांधीनी चले जावचा आजाद क्रांती मैदानातून नारा दिला होता. म्हणून हा दिवशी क्रांती दिवस म्हणून साजरा करत आहोत. 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात व परिसरात 75 किलोमीटर यात्रा करून काँग्रेसचा विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवायचा, असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Politcs| Nana Patole|
Congress agitation : नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नाही

ते पुढे म्हणाले की, मागील आठ वर्षांपासून देशातील संविधानिक व्यवस्थेला, देशाच्या लोकशाहीला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने देशातील माणूस पुढे चालला. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक धोरण बदलून केंद्र सरकारने जीएसटीसारखा इंग्रजांचे धोरण आणले. देशातील सर्वसामान्य जनतेला लुटून त्यांच्या मूठ भर मित्रांना फायदा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हे जनतेपर्यंत पोचविणे हा यात्रेचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Politcs| Nana Patole|
Congress aggressive : नाना पटोले आक्रमक मोडवर : राजभवनाला घेराव घालणार

हे सरकार जास्त दिवसांचे नाही. जोरजबरदस्तीने, पैशाच्या जोरावर, केंद्रीय तपास यंत्रणेचा दूर उपयोग करून आलेले हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारचे भविष्य नाही. महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की, मंत्रिमंडळाचे तातडीने खाते वाटप व्हायचे. दोन दिवस होऊनही खाते वाटप नाही. यावरून त्यांची मलाईदार खात्यांसाठी कशी लढाई सुरू असेल हे कळते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना गुजरात धार्जनी महाराष्ट्रातील ईडी सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. हे सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही तर गुजरात व दिल्लीत बसलेल्या गुजराती नेत्यासाठीचे सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com