शरद पवारांना वेगळ्या पध्दतीनं समोर जायचं असेल! बच्चू कडूंची गुगली

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर कडू यांनी निशाणा साधला आहे.
Minister Bacchu Kadu Latest Marathi News
Minister Bacchu Kadu Latest Marathi News Sarkarnama

अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीवर प्रहार केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केल्यानंतर कडू यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. (Bacchu Kadu Latest Marathi News)

माध्यमांशी बोलताना कडू यांनी गुगली टाकली. ते म्हणाले, आपलं नियोजन चुकीचं करायचं, चुकीच्या पध्दतीनं जायचं. आपली तयारी करायची नाही आणि दुसऱ्याला विजय भेटला तर त्याचं कौतुक करायचं. एवढं कौतुक करण्याएवढं त्यात काही नाही. पवार साहेब जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असते हे सांगता येत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने समोर जायचे असेल त्यामुळे त्यांनी कौतुक केलं असावं.

Minister Bacchu Kadu Latest Marathi News
पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं पण पंकजा मुंडेंचं मौन का? राजकीय चर्चांना उधाण

दरम्यान, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या दोन पक्षांनी आपापल्या उमेदवारांना अतिरिक्त मते दिल्यामुळेच महाविकास आघाडीचे गणित फिसकटल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली म्हणजेच शिवसेनेने जोखीम पत्करली. पण राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना ४२ आणि काॅंग्रेसच्या प्रतापगढी यांना ४४ मते मिळाली. म्हणजे अनुक्रमे एक आणि दोन मते अतिरिक्त मिळाली.

आपले उमेदवार सुरक्षित करण्यासाठी या दोन पक्षांनी हे पाऊल उचलणे गैर नाही, पण महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी रिस्क घ्यायला हवी होती, पण तसे झाले नाही. शिवाय अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही, त्याचा फटका, शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे बाद झालेले मत आणि काही अपेक्षांनी केलेला दगाफटका हाच शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला. सरसकट सगळ्या अपक्ष आमदारांना दोषी ठरवता येणार नाही,काहीजणांनी निश्चितच दगाफटका केला, पण काहीजण महाविकास आघाडीसोबत होते हे देखील नाकारता येणार नाही.

Minister Bacchu Kadu Latest Marathi News
Beed : ताकद दाखवली, तर पक्षाला पंकजा मुंडेंची दखल घ्यावीच लागेल..

नवाब मलिक, अनिल देशमुख विधानसभेचे सदस्य असतांना न्यायालयाने त्यांना मतदानाला परवानगी दिली नाही, हा निर्णय म्हणजे संशोधनाचा विषय असल्याची टीका देखील बच्चू कडू यांनी केली. या शिवाय भाजपने ईडीचा दबाव टाकून काही अपक्ष आमदार, आघाडीच्या नेत्यांना मदत करायला भाग पाडले, असा आरोप देखील कडू यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com