Marathwada : हे कसले मोठे नेते, एकाने गद्दारी केली, दुसऱ्याकडे एकही आमदार नाही.. तर तिसरा..

मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळे हे तिघेही एकत्र आले आहेत. मुळात आम्ही या तीन्ही नेत्यांना मोठे मानतं नाही. लोक त्यांना मोठे का मानतात? मला कळत नाही. (Marathwada)
Opposition Leader Danve`s Reaction On Three Leaders News
Opposition Leader Danve`s Reaction On Three Leaders NewsSarkarnama

औरंगाबाद : राज्यात सध्या शिंदे गट, मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे. मनसेच्या शिवाजीपार्कवरील दीपोत्सव सोहळ्याला राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या तीन मोठ्या नेत्यांच्या एकत्र येण्याने राज्यात चर्चेला उधाण आले असले तरी शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मात्र या तिघांनाही मोठे नेते मानायला तयार नाहीत.

Opposition Leader Danve`s Reaction On Three Leaders News
Shivsena : अखेर दानवेंचा भार ठाकरेंनी कमी केलाच, तनवाणींची जिल्हाप्रमुख पदी निवड

औरंगाबादेत पत्रकार परिषदेत या तीन नेत्यांबद्दल विचारले असता लोक त्यांना मोठे नेते का म्हणतात? ते कसले मोठे? एकाने ४० आमदार पळवून नेत गद्दारी केली, दुसऱ्याकडे एकही आमदार नाही, तर तिसरे मुख्यमंत्री (Eknath Shinde) होते, ते आता मुख्यमंत्री झाले आहेत, असा खोचक टोला दानवे यांनी शिंदे-फडणवीस व राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांची दहशत असल्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे तीघे एकत्र येत असल्याचे दानवे म्हणाले.आगामी महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. परंतु याकडे शिवसेना मात्र फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे.

अंबादास दानवे यांनी या तीन नेत्यांची भेट दुर्लक्षित करत लोक यांना मोठे नेते कसे मानतात? असा सवाल केला आहे. अंबादास दानवे म्हणाले, मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळे हे तिघेही एकत्र आले आहेत. मुळात आम्ही या तीन्ही नेत्यांना मोठे मानतं नाही. लोक त्यांना मोठे का मानतात? मला कळत नाही.

कारण एक जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी गद्दारी करत ४० आमदार पळवून नेले आहेत. तर दुसरे नेते त्यांचा तर एकही आमदार निवडून आलेला नाही. तिसरे नेते जे राज्याचे मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. मग ते मोठे कसे, तुम्हीही त्यांना महत्व देवू नका, असा सल्ला देखील दानवे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com