Latur : तरुणांनो, सुशिक्षित बेरोजगार होण्यापेक्षा शिक्षित शेतकरी व्हा..

बाजारात निकृष्ट प्रतीचे बियाणे येणार नाही, त्यात गैरव्यवहार होणार नाही, शेतकरी बांधवांची हेळसांड होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. (Mla Dhiraj Deshmukh)
Mla Dhiraj Dehsmukh News, Latur Latest Marathi News
Mla Dhiraj Dehsmukh News, Latur Latest Marathi NewsSarkarnama

लातूर : तालुक्यातील भातांगळी येथे शेतीसाठी फायदेशीर ठरत असलेल्या टोकन पेरणी यंत्र व बीबीएफ पेरणी यंत्राची माहिती घेऊन लातूर (Latur) ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी स्वतः या यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक करून पाहिले. (Dhiraj Deshmukh) अधिकाधिक उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (Dhiraj Dehsmukh News)

राज्य सरकारच्या कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन धिरज देशमुख यांच्या हस्ते बुधवारी येथे झाले.(Marathwada) यावेळी त्यांनी टोकन पेरणी यंत्र व बीबीएफ पेरणी यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

देशमुख म्हणाले, धाडस करुन अनेकांनी सोयाबीनची टोकन पद्धतीने व बीबीएफ तंत्राद्वारे लागवड करुन चांगला रिझल्ट मिळवला आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवले आहे. विपरीत वातावरणातही अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी हे यश मिळवले असून हे चित्र आनंददायी आहे. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा, प्रयोगांचा अधिकाधिक अवलंब व्हायला हवा.

तरुणांनी सुशिक्षित बेरोजगार होण्यापेक्षा शिक्षित शेतकरी व्हावे. ही काळाची गरज आहे. पालकांनीही आपल्या मुलांना शिक्षण देऊन शेतीकडे वळविण्यासाठी प्रोत्साहित करावे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या गरजा व त्यांची अडचण लक्षात घेऊन नवनव्या योजना आणत आहे.

आपल्याकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मदत व्हावी यासाठी जिल्हा बँक सोयाबीन पिकासाठी हेक्टरी ६० हजार रुपयांचे कर्ज देते. शेती, पशुधनाबरोबरच घरगुती कारणांसाठी, शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. सर्वसामान्य शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा बँक कार्यरत आहे. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.

Mla Dhiraj Dehsmukh News, Latur Latest Marathi News
दरेकरसाहेब, भाजपातील उपटसुंभांचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का?

खरीप हंगाम जवळ आला आहे. खते, बियाणे याचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्ष रहावे. बाजारात निकृष्ट प्रतीचे बियाणे येणार नाही, त्यात गैरव्यवहार होणार नाही, शेतकरी बांधवांची हेळसांड होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच, शेतकरी बांधवांनीही खते, बियाणे वापराबाबत दक्ष रहावे, असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com