Marathwada News: राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे व त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या यशवंत सुतगिरणीत मोठा घोटाळा झाल्याचा ठपका लेखा परिक्षणातून ठेवण्यात आला आहे. वाढीव वीज बील, बोगस कापूस खरेदी, धाग्याच्या नोंदी करून कोट्यावधी रुपयांचे सरकारी अनुदान उचलल्याचे (Audit Report) लेखा परीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र असा कोणाताही घोटाळा झाला नसून दोन दिवसांत सत्य परिस्थिती समोर येईल, असे टोपे यांनी म्हटले आहे.
अंबड येथील यशवंत सहकारी सुतगिरणी टोपे (Rajesh Tope) कुटुंबियांच्या ताब्यात आहे.(Ncp) लेखा परीक्षक व्ही. आर. काटकर यांनी केलेल्या २०१९ ते २१ या दोन वर्षातील लेखा परीक्षणातून हा सगळा प्रकार समोर आला आहे.
यात प्रामुख्याने टोपे यांनी मार्च २०२१ मध्ये लागलेल्या आगीत मागील सहा वर्षाच्या नोंदी नष्ट झाल्याचा दावा केला होता. परंतु पोलिस पंचनाम्यात याचा उल्लेख नसल्याचे सांगत लेखा परिक्षकांनी तो फेटाळला होता.
सहकार खात्याच्या विशेष लेखा परीक्षणातून या बाबी समोर आल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. मात्र, असा कोणताही घोटाळा झाला नाही, याबाबत दोनचार दिवसात खरंखोटं समोर येईल, याला फार महत्व देवू नका, असा शब्दात टोपे यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.