
Aimim : मुंबईत झालेल्या एमआयएमच्या पहिल्याच राष्ट्रीय अधिवेशनात खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आपली छाप पाडली. अभ्यासपूर्ण तसेच आक्रमक भाषण करत त्यांनी देशभरातून आलेल्या पक्षाच्या नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे बौद्धीक घेतले. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांच्या नामांतरावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले, हा विषय देखील एमआयएमच्या अधिवेशनात चांगलाच गाजला.
इम्तियाज जलील यांनी यावरून भाजपला सुनावले. जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगभरातील विदेशी प्रतिनिधी पुढील तीन दिवस छत्रपती संभाजीनगरात मुक्कामाला आहेत. (Aimim) याचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध दर्शवत `तुम्हारा जी-२०, तो हमारा टी-२०`, असे म्हणत आंदोलनाचा इशारा दिला. (Bjp) भाजप खेळ करु शकते, तर आम्ही देखील करू शकतो, असे इम्तियाज यांनी ठणकावून सांगितले.
एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनात झालेल्या ठरावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतांनाच इम्तियाज यांनी केलेल्या भाषणाची त्यात फडणवीस, शिंदे यांचा केलेला एकेरी उल्लेख यावरही खल सुरू आहे. इम्तियाज जलील यांनी अधिवेशनातील भाषणात औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचे श्रेय घेणाऱ्यांना टोला लगावला.
` देवेंद्र बोलता मैने करा, शिंदे बोलता मैने करा, और जिनका नाम और निशाण मिटगया वो भी बोलता मैने करा`, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जी-२० ला टी-२० ने उत्तर देणार, म्हणजे इम्तियाज जलील नेमकं काय करणार ? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.