Haribhau Bagde News : लोकांची मने कशी जिंकणार? हरिभाऊ बागडेंनी सांगितलं गुपित

राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले.
Mla Haribhau Bagde News, Aurangabad
Mla Haribhau Bagde News, AurangabadSarkarnama

Haribhau Bagde News : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यानंतर आता नवनिर्वाचित सरपंचांच्या कामाला सुरुवात होत आहे. भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत आपणच नंबर वन असल्याचा दावाही केला आहे. असे असताना दुसरीकडे भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना मोलाचा सल्ला दिला आहे. राजकारण असताना लोकांची मने कशी जिंकायची याचे उदाहरण यावेळी बागडे यांनी दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ रंग मंदिर नाट्यगृहात नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पक्षाकडून सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम हरिभाऊ बागडे बोलत होते. यावेळी त्यांनी आपला राजकीय अनुभव शेअर करत नवनिर्वाचित सरपंचांना राजकीयदृष्ट्या मोलाचे सल्लेही दिले. 'लग्नाची पत्रिका असो नसो, लोकांच्या लग्नाला जा' असा सल्ला बागडे यांनी म्हटलं आहे.

बागडे म्हणाले की, लग्नाची पत्रिका मिळो की न मिळो पण लोकांच्या लग्नाला जात जा, नवरीकडील लोकांना वाटेल नवरदेवाकडून पत्रिका असेल आणि नवरदेवाकडील लोकांना वाटेल नवरीकडील पत्रिका असेल. त्यामुळे लग्नाला जा, तिथे अनेक लोकं तुम्हाला तिथे पाहत असतात. लग्नात पत्रावळ उचलू नका, पण नुसते वाका म्हणजे तुम्हाला वाकलेलं पाहून लोकं पत्रावळी उचलण्यासाठी येतील आणि लोकांना तुम्ही देखील वाकलेले दिसाल, असा सल्ला बागडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिला आहे. पण आता त्यांनी दिलेल्या या हटके सल्ल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com