स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर मागावी लागणे ही बीडला काळीमा फासणारी घटना

बीड जिल्हयात माफियाराज बोकाळल्याचा आणखी कुठला पुरावा हवा आहे, असा सवाल करत याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही केला. (Pankaja Munde)
Pankaja Munde-Dhnanjay Munde
Pankaja Munde-Dhnanjay MundeSarkarnama

बीड ः कंत्राटदार धमक्या देऊन , कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात, असा खळबळजनक आरोप अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी केला. (Beed) एवढेच नाहीतर मला रिव्ह्राॅल्व्हर द्या, अशी मागणी देखील त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली. यानंतर आता जिल्ह्यात राजकारण सुरू झाले आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी कोकणे यांना धमकावणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार द्या, कारवाई निश्चित करू, असे आश्वासन दिले आहे. (PWD) तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या प्रकारावरून पुन्हा एकदा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, माफियाराजवर बोट ठेवत टीका केली आहे.

पकंजा मुंडे यांनी ट्विट करत या गंभीर प्रकारावर भाष्य केले आहे. ` बीड जिल्ह्यात एक कार्यकारी अभियंता स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हरची मागणी करतो, किती दुर्दैवी. बीलासाठी राजकीय ठेकेदार यांचा दबाव, सर्व प्रकारचे माफिया कारभार बीडच्या नावाला काळीमा फासणारे आहेत, याची वैधानिक दखल घ्यावी`, अशा शब्दांत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

सरकारी अधिकाऱ्यांना जिल्हयात काम करणे सध्या कठीण झाले आहे. खोटया बिलावर सहया करण्यासाठी धमक्या देणाऱ्या गुत्तेदारापासून संरक्षण मिळाव, अशी मागणी करण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येणे ही दुर्दैवाची आणि तितकीच चिंता करणारी बाब असल्याचेही पंकजा म्हणाल्या.

बीड जिल्हयात माफियाराज बोकाळल्याचा आणखी कुठला पुरावा हवा आहे, असा सवाल करत याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही केला. जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्याचे नियंत्रण, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, त्यामुळेच गेल्या कांही महिन्यांपासून वाळू, गुटखा माफिया, चोर, गुंडांना अभय, खोटया केसेस दाखल करणे, गुन्हयात अडकवणे, व्यापाऱ्यांच्या एजन्सी हडपणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे असे प्रकार सत्तेचा गैरवापर करून सर्रास सुरू असल्याचा आरोप देखील पंकजा यांनी केला.

Pankaja Munde-Dhnanjay Munde
धनंजय मुंडे यांना आली जाग..

कायद्याचा धाकच राहिला नसल्याने लोक आता मर्जीविरुद्ध जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. सर्वच विभागातले अधिकारी याला वैतागले असून जिल्ह्यात काम करणे त्यांना कठीण झाले आहे. पण तक्रार करायला कुणीही धजावत नाही. सत्ताधाऱ्यांना हेच पाहिजे असल्याने अधिकाऱ्यांवर रिव्हॉल्व्हर मागण्याची वेळ आली आहे, असा आरोपही पंकजा यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com