Rohit Pawar : राज्यपालांना विचारांची पातळीच नाही ; महाराष्ट्राची जनता त्यांना इथे ठेवणार नाही..

भाजपचा एक प्रवक्ता दिल्लीत बसून म्हणतो की महाराजांनी माफी मागितली होती. एकदा तू महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही. (Rohit Pawar)
Mla Rohit Pawar-Governor Koshyari News, Aurangabad
Mla Rohit Pawar-Governor Koshyari News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले. आधी मला वाटायचे की राज्यपालांच्या विचारांची पातळी फारचं खालची असेल, पण आता समजले की त्यांना विचारांची पातळीच नाही. अशा विचारांची पातळी नसलेल्या लोकांना महाराष्ट्रातील जनता इथे राहू देणार नाही, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी राज्यपालांच्या विधानाचा समाचार घेतला.

Mla Rohit Pawar-Governor Koshyari News, Aurangabad
Congress : राज्यपालांना हटवा, आफताबला फाशी द्या ; काॅंग्रेसची मागणी..

भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी अनेकदा माफी मागितली, या वक्तव्यावर `तु एकदा महाराष्ट्रात ये, तुला माफी मागयच्या लायकीचं ठेवणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला. (Rohit Pawar) रोहित पवार आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर होते. पैठण तालुक्यातील बालानगर येथे त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून मात्र या विषयावर फार काही बोलायचे नाही, अशी भूमिका दिसून आली आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्यात बोलतांना रोहित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांच्यावर सडकून टीका केली. रोहित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही दिल्लीपुढे झुकले नाही, हा इतिहास आहे.

पण भाजपचा एक प्रवक्ता दिल्लीत बसून म्हणतो की महाराजांनी माफी मागितली होती. एकदा तू महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही. अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागायच्या लायकीचं ठेवणार नाही', असा इशारा यावेळी रोहित पवारांनी दिला.

भाजपचा एकही नेता यावर बोलायला तयार नाही, केवळ राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर हे लोक करत आले आहेत. राज्यपाल, भाजपच्या प्रवक्त्यांनी महाराजांबद्दल वादग्रस्त विधाने केल्यानंतर एकही भाजपचा आमदार, नेता यावर का बोलत नाही? असा सवाल देखील पवार यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com