
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात शुक्रवारी (ता. आठ) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने गावात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना स्थलांतरित करण्यात आले तसेच आसना नदीला देखील पूर आल्याने किन्होळा गावात पाणी शिरले आहे. याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला.
नागरीकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी जितेंद्र पापळकर यांना दिले आहेत. (Hingoli) तसेच टाकळगव्हाण येथे अडकलेल्या दोन कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढावे, जिल्हयातील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश देखील त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (Marathwada)
वसमत तालुक्यातील कुरुंदा परिसरात मोठा पाऊस झाला असून १७९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच गिरगाव मंडळात देखील अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे कुरुंदा व परिसरातील काही गावांत नुकसान झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मोबाईलवरुन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधून पुर परिस्थितीचा आढावा घेतला.
पुरात अडकलेल्या टाकळगव्हाण शिवारातील दोन कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुर परिस्थितीमध्ये जिवीत हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, स्थलांतरीत झालेल्या कुटुंबाच्या भोजनाची , पाण्याची व्यवस्था करावी त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देऊ नका, असे स्पष्ट सांगत सर्व अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी पुरग्रस्त भागात पाठविण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.