पाच किलोमीटरचा व्हीआयपी रस्ता, दोन हजार खड्डे; मनसेने घातले श्राद्ध...

(Mns Aurangabada)एमएसआरडीसीतील अधिकारी,काॅन्ट्रॅक्टर या सर्वांचा (Msrdc) निषेध करत मनसेच्या वतीने श्राद्ध घालण्यात आले.
Mns protest Aurangabad
Mns protest AurangabadSarkarnama

औरंगाबाद ः स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या शहरातील व्हिआयपी रस्त्यावरच हजारो खड्डे पडले आहेत. वर्षानुवर्ष कोट्यावधी रुपये खर्चून देखील या रस्त्यांची दुरावस्था होते आहे. याला कारणीभूत असणारे रस्ते विकास महामंडळातील अधिकारी आणि त्यांचे काॅन्ट्रॅक्टर या सर्वांचा निषेध करत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्राद्ध घालण्यात आले.

जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने हे अनोखे आंदोलन करत आठ दिवसात व्हिआयपी रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही, तर एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना खड्यात आणून बसवू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

औरंगाबाद शहरातील व्हिआयपी रस्ता हा साधरणतः पाच किलोमीटरचा आहे. या रस्त्यावर मुख्यमंत्री, मंत्री,आमदार, खासदार या सर्वच लोकप्रतिनधींच्या गाड्या धावत असतात. परंतु याच व्हिआयपी रोडची चाळण झाली असून तब्बल दोन हजार खड्डे या रसत्यावर पडल्याचा दावा करत मनसेने आज अनोखे आंदोलन केले.

रस्ते विकास महामंडळाच्या बेजबादार अधिकाऱ्यांना निषेध म्हणून सुहास दाशरथे यांच्या हस्ते त्यांचे श्राद्ध देखील घालण्यात आले. शहरवासियांच्या पाणी, रस्ते, वीज, कचरा या मुलभूत प्रश्नांवर मनसेने सध्या आंदोलनाचा सपाटा लावला आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुका पाहता मनसेची ही जोरदार तयारी असल्याचे बोलले जाते.

शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थे संदर्भात मनसेने याआधी देखील आंदोलन केले होते, पण आजचे आंदोलन काहीसे निराळे आणि सत्ताधारी आमदार, खासदार, मंत्र्यांना हिणवणारे होते. ज्या व्हिआयपी रस्त्यावरून नेते, पुढाऱ्यांची वाहने धावतात त्याच व्हिआयपी रस्त्याची निवड करत मनसेने त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. विशेष म्हणजे या खड्ड्यांना जबाबदार असणारे रस्ते महाविकास मंडळातील अधिकारी आणि कंत्राटदार यांचे श्राद्ध देखील आज सर्वपित्री आमवस्येच्या मुहूर्तावर मनसेच्या वतीने घालण्यात आले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना मनसे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे म्हणाले, व्हिआयपी रोडवरून दररोज जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस पक्षाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार आपल्या गाड्यांमधून फिरत असतात. पाच किलोमीटरचा हा रस्ता, पण त्यावर दोन हजार खड्डे पडले आहेत. वेळोवेळी मागणी करून देखील एमएसआरडीसीचे निर्ढावलेले भ्रष्ट अधिकारी या रस्त्याची दुरुस्ती करत नाही. कंत्राटदार त्याकडे ढुंकून पहायला तयार नाहीत.

एकीकडे आपण स्मार्ट सिटीच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे व्हिआयपी रस्त्याचीच ही अवस्था आहे. विशेष म्हणजे कागदोपत्री या रस्त्याच्या डागडुजी आणि दुरुस्तीवर ६० लाख रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. मग हे पैसे गेले कुठे?

Mns protest Aurangabad
आमदार राजूरकर म्हणतात, प्रताप चिखलीकर ज्यांचा धनी, त्यांच्या मागे शनि..

त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेला आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबादार असलेल्या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारी व कंत्राटदारांचे आम्ही श्राद्ध घालत आहोत. आठ दिवसाच्या आत जर रस्त्यावरील खड्डे दुरुस्त केले नाहीत, तर अधिकाऱ्यांना या खड्ड्यात आणून बसवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, अशा इशारा देखील दाशरथे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com