उस्मानाबाद : राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. हे पाणी ओसरायला किमान ३ महिने लागतील. मात्र सरकारकडे आर्थिक चणचण असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यास सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. (Affected Farmers) एखादं फ्यूज उडालं तरी ते लावण्यासाठी सरकारकडे पैसे नाही असे कृषी मंत्र्यांनीच म्हटलं आहे. (Marathwada)
सरकारला मायबाप म्हटलं जातं, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली पाहिजे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे.
आंबेजवळगा व कौडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दानवे यांनी नुकसानाची पाहणी केली. शेतात गेल्या एक-दीड महिन्यापासून पाणी साचल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी लक्ष्मण वाघे यांच्या घरी भेट देऊन दानवे यांनी कुटुंबियांचे सात्वंन केले. शिवसेना दुःखात उघड्यावर सोडणार नाही, आपल्या सदैव पाठीशी असून मदतीसाठी तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले. वाघे यांच्या कुटुंबियाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदतही यावेळी देण्यात आली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.