नामांतराच्या निर्णयानंतर चंद्रकांत खैरेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा; आता...

Shivsena| Chandrakant Khaire| आजच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आले.
 MP Chandrakant Khaire|
MP Chandrakant Khaire|

औरंगाबाद : ''आम्ही मंत्रिमंडळात मागणी केली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) निर्णय घेतला. पण तुम्ही फक्त श्रेय घेण्यासाठी ठाकरे सरकारचा निर्णय रद्द केला आणि आज पुन्हा हा निर्णय घेतला. काल आम्ही आंदोलन केले म्हणून तुम्ही आज जागे झाले आणि औरंगाबादचे नामांतर संंभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव केले, पण या निर्णयाचे सर्व श्रेय फक्त दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाच जातं,'' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारला ठणकावून सांगितलं.

आता जर तुम्ही नामांतराचा निर्णय घेतलाच आहे तर एका महिन्यात केंद्राकडून मंजूरी मिळवा नाहीतर फिरू देणार नाही, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. याचवेळी त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी निर्णय का घेततला नाही, असा सवालही खैंरेंनी उपस्थित केला.

 MP Chandrakant Khaire|
उस्मानाबादचं धाराशिव, तर औरंगाबादच्या नामांतरात एक बदल ; शिंदे सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठे निर्णय घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नामांतराची घोषणा केली. ठाकरे सरकारने घेतलेले औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे निर्णय घेतले होते. मात्र नव्या शिंदे सरकारने हे निर्णय रद्द केले. त्यानंतर आजच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आले. आज सकाळी औरंगाबादमध्ये नामांतरासाठी शिवसैनिकांनी चंद्रकांत खैरे आणि आंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात आंदोलने करण्यात आली.

"ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये घाईघाऊने औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतराचा निर्णय घेतला. पण नामांतरचा घाईत घेतलेला निर्णय चुकीचा होता. बहुमत चाचणीची सूचना असतानाही ठाकरे सरकारने नामांतराचे ठराव मंजूर केले. पण आम्ही कोणत्याही निर्णयांना स्थगिती दिली नाही. ठाकरे सरकारने अल्पमतात असताना नामांतराचे निर्णय घेतले जे अयोग्य आहे. ज्या सरकारकडे बहुमत ते सरकार निर्णय घेऊ शकते. आता औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com