संभाजीनगर-धाराशिवची प्रक्रिया पूर्ण; कधीही घोषणा होणार : चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा

Aurangabad | Chandrakant Khaire | : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ जूनच्या सभेत घोषणा करणार?
Chandrakant Khaire
Chandrakant Khairesarkarnama

औरंगाबाद : राज्यातील उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या नामांतराबाबत माजी खासदार आणि शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एक मोठा दावा केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच या जिल्ह्यांना संभाजीनगर आणि धाराशिव म्हणून ओळखले जाईल माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. कार्यकर्त्यांची बऱ्याच दिवसांपासून अशी मागणी होती, असे खैरे यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना खैरे म्हणाले, कार्यकर्त्यांची अनेक दिवसांपासून खूप इच्छा होती. धाराशिव व संभाजीनगर अशीअधिकृत नावं कधी होणार अशी विचारणा केली जात होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या भाषणात सांगितलं की, आपण म्हणतोच संभाजीनगर, नामांतराची गरज आहे काय? पण त्यावर अनेकांनी प्रश्न केले की, हे नामांतर अधिकृत कधी करणार?

पण आता धाराशिव आणि संभाजीनगर या नावांची कायदेशीर तयारी पुर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबतची कधीही घोषणा करतील असेही खैरे यांनी सांगितले. दरम्यान खैरे यांच्या या दाव्यानंतर सरकार याबाबतची अधिकृत घोषणा कधी करेल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते काही बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com