Chandrakant Khaire : वंचित आघाडीवर बोललो ते शब्द मी मागे घेतले ; माझा राग एमआयएमवर..

माझा राग एमआयएमवर आहे, या एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील फसवले, आंबेडकरांचा दोन्ही ठिकाणी पराभव केला. त्यामुळेच वंचितने एमआयएमची साथ सोडली. (VBA)
Chandrakant Khaire-Prakash Ambedkar-Imtiaz Jalil
Chandrakant Khaire-Prakash Ambedkar-Imtiaz JalilSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मी जे बोललो, जे आरोप वंचित बहुजन आघाडीवर (Vanchit Bahujan Aghadi) केले होते ते मी मागे घेतले आहे. मुळात माझा राग एमआयएमवर (Aimim) आहे. वंचितच्या नेत्यांशी मी संपर्क साधून जे बोललो ते शब्द मागे घेत असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे यावर आता कुठलाही वाद नाही, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व एमआयएमने भाजपकडून १ हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. (Aurangabad) प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद यांनी खैरे यांना कोर्टात खेचण्याचा, तर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी माफी मागा नाहीतर दिसाल तिथे काळं फासू, कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला होता.

एवढेच नाही तर चंद्रकांत खैरे यांची ईडीकडून चौकशी करा, अशी मागणी देखील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी काल झालेल्या बैठकीत केली होती. एकंदरित हे विधान अंगलट येणार याची जाणीव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी वंचितवर केलेले आरोप आपण मागे घेत आहोत, जे बोललो ते शब्द देखील मागे घेत असल्याचे सांगितले.

शनिवारी जालना येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलतांना खैरे यांनी वंचित आघाडी व एमआयएमवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर खैरे यांच्या विरोधातला रोष वाढत होता, न्यायालयात खेचण्याची, काळ फासण्याची व कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी वंचितने सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांचे नेमके म्हणणे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Chandrakant Khaire-Prakash Ambedkar-Imtiaz Jalil
Aurangabad : उद्धव ठाकरेंच्या रेकाॅर्डब्रेक सभेसाठी पंधराशे बैठका, नेत्यांचे दौरे..

खैरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र होती. तेव्हा या दोन्ही पक्षांवर गंभीर आरोप केले जात होते. त्याचा संदर्भ मी बैठकीत दिला. त्यानंतर अनेकांचे मला फोन आले, तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत, तेव्हा मी देखील माझे शब्द मागे घेत असल्याचे त्यांना सांगितले. माझ्या दृष्टीने हा वाद मी संपवला आहे. वंचितच्या नेत्यांना तसा निरोप देखील मी दिला आहे.

माझा राग एमआयएमवर आहे, या एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील फसवले, आंबेडकरांचा दोन्ही ठिकाणी पराभव केला. त्यामुळेच वंचितने एमआयएमची साथ सोडली. भविष्यात वंचित आघाडी आमच्यासोबत देखील येऊ शकते. त्यामुळे माझा आणि वंचित आघाडीचा आता कुठलाही वाद राहिलेला नाही. मी माझे शब्द मागे घेतलेले आहेत, असेही खैरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com