मंत्रीमंडळ विस्तार ; टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने सत्तारांचा `बिसमिल्ला` होणार ?

सत्तार हे आपल्या भाषणातून भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करतांना नेहमी ते माझा बिसमिल्ला करणार होते, पण तो झालाच नाही असे वारंवार जाहीर भाषणांमधून सांगत आले आहेत.(Abdul Sattar)
Mla Abdul Sattar News, Aurangabad
Mla Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : नावातच `सत्ता`र असल्यामुळे कायम सरकारमध्ये, मंत्रीमंडळात वर्णी लागत आलेले माजी महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) ऐन मंत्रीमंडळ विस्तार होत असतांनाच अडचणीत आले आहेत. (Aurangabad) राज्यात गाजलेल्या आणि आता ईडीकडे तपास जाणार असलेल्या टीईटी म्हणजेच शिक्षक भरती घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अपात्र ठरवलेले असतांना सत्तार यांच्या मुली त्यांच्या सिल्लोड येथील शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होत्या आणि पगार उचलत होत्या, अशी माहिती समोर आली आहे. परंतु ही माहिती अतिशय चुकीच्या वेळी समोर आली असेच म्हणावे लागेल. कारण उद्या (Eknath Shinde) शिंदे-फडणवीस सरकारचा सव्वा महिन्यापासून रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार होत आहे.

या मंत्रीमंडळात आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्यांची पुन्हा वर्णी लागणार असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे दोघेही ठाकरे सरकारमध्ये अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्री होते. शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात हे दोघेही हिरारीने सहभागी झाले, त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची बक्षिशी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून निश्चित मानली जात आहे.

परंतु टीईटी घोटाळ्याचे प्रकरण आणि त्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे समोर आल्याने सत्तारांनी मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? की मग त्यांच्याच भाषेत त्यांचा `बिसमिल्ला` होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेले अब्दुल सत्तार ज्या पक्षात जातात, त्या पक्षाला आपल्या बाजूने वळवतात हे आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय वाटचालीवरून स्पष्ट झाले आहे.

Mla Abdul Sattar News, Aurangabad
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांना शिक्षण मंत्री करतील... पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका

योगायोग असा की सत्तार दावा करतात, तसा त्यांना नावाप्रमाणे ते नेहमीच सत्ताधारी पक्षाचेच भाग बनत आलेले आहेत. मतदारसंघातील ग्रापंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत सगळ्या निवडणुकीत सत्तार यांनी आपली ताकद सिद्ध केलेली आहे. सातत्याने यश मिळत गेल्यामुळेच कदाचित सत्तार यांचा स्वभाव हम करे सो कायदा असा झाला आहे. त्यामुळे ते राजकीय नेते असो की प्रशासनातील अधिकारी आपल्याला पाहिजे ते निर्णय घ्यायला भाग पाडतात, असे दिसून आले आहे.

अब्दुल सत्तार हे आपल्या भाषणातून भाजप आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करतांना नेहमी ते माझा बिसमिल्ला करणार होते, पण तो झालाच नाही असे वारंवार जाहीर भाषणांमधून सांगत आले आहेत. अगदी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो सिल्लोड दौरा झाला, तेव्हा देखील दानवे यांच्या उपस्थितीत सत्तारांनी पुन्हा एकदा टोला लगावला होता.

आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मुंबईत बसून उद्याच्या मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करत आहेत,संभाव्य मंत्र्यांना निरोप देत आहेत, अशावेळी मुंबईतच ठाण मांडून असलेल्या सत्तारांना फोन येणार का? की त्यांचा बिसमिल्ला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com