पठ्ठ्या कुठंय? दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख

''हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांना जबाबदार आहे, हे मला तुम्ही सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला,''
Uddhav Thackeray, Raosaheb Danve

Uddhav Thackeray, Raosaheb Danve

sarkarnama

बदनापूर (जालना) : ''विना मुख्यमंत्र्याचे कुठे राज्य चालतं का,'' असा प्रश्न उपस्थित करीत भाजपचे नेते, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दानवे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारात बदनापूर येथे बोलत होते. बदनापूर येथे रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर (cm Uddhav Thackeray) टीकास्त्र सोडले.

रावसाहेब दानवे म्हणाले, ''मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीत शिवसेनेच्या एका मंत्र्याला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली असती तर हे राज्यं चालल नसतं का? दोन महिन्यांपासून पठ्ठ्या कुठंय? विना मुख्यमंत्र्याचं कुठे राज्य चालत असतं का?'' उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दानवे यांनी एकेरी भाषेचा वापर केल्याने समाजमाध्यमांवर दानवेंवर टीका होत आहे.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray, Raosaheb Danve</p></div>
भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार घालवाच!

''हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातल्या १२ कोटी लोकांचा जबाबदार आहे, हे मला तुम्ही सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला. आता तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही कुणी, हे काय म्हणतात, आमचं कुटुंब आमची जबाबदारी. मुख्यमंत्री परभणीला आले त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितले कर्ज काढून हॉटेल बांधले. बॅंकवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी," असा टोला दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

दानवे म्हणाले, ''कोरोना काळात केंद्राप्रमाणे राज्यानेही पॅकेज जाहीर करायला हवे होते. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात अन्नधान्याचा साठा किती आहे, त्यावर विचारणा केली होती. देशात दोन-तीन वर्ष पुरेल एवढा साठा असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी कोरोना काळात मोफत अन्न धान्य द्यावे अशी सूचना केली आहे. कोरोनाचे संकट कायम असेपर्यंत ही योजना सुरू ठेवावी असेही मोदी यांनी म्हटले होते,''

ठाकरे सरकारचं चहलांना एक हजार कोटी वसुलीचं टार्गेट ; भाजपचा आरोप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी लेटरबॉम्ब टाकला होता. यात त्यांनी 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणामुळे देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार अमित साटम ( Amit Satam)यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका या सर्वांना 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप अमित साटम यांनी केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला आहे. हे वसुलीचं काम महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट असलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com