Bhumre : खोक्यांच्या आरोपापेक्षा विकासकामांवर बोला, मला ते आवडेल..

५० खोके घरात ठेवणे एवढे सोपे असते का? उगाच करायचे म्हणुन आरोप करण्यात काही अर्थ नाही. (Gurdian Minister Bhumre)
Guardian Minister Sandipan Bhumre news, Aurangabad
Guardian Minister Sandipan Bhumre news, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिंदे गटाचे बंड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर विरोधकांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यामुळे शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेसह अपक्ष आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. या आरोपांमुळे शिंदेसेनेचे मंत्री, आमदार, खासदार पुरते वैतागले आहेत. यातूनच त्यांच्याकडून विरोधकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका आणि त्यातून संकटे ओढावून घेतली जात आहेत.

Guardian Minister Sandipan Bhumre news, Aurangabad
Shivsena : `मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी`, पायी दिंडी जालना मतदारसंघात..

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याच मुद्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. (Shivsena) त्यानंतर राज्यभरात आंदोलन पेटले होते. त्यामुळे आता शिंदे सेनेतील मंत्र्यांची भाषा बदलायला लागली आहे. राज्याचे रोजगार हमी योजना तथा औरंगाबादचे (Guardian Minister) पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी एका कार्यक्रमात ` आमच्यावर ५० खोके घेतल्याचे आरोप करण्यापेक्षा आम्ही विकासाची कोणती कामे केली नाहीत, याचा जाब विचारणारे विरोधक आणि नेते अधिक आवडतील`, असे म्हटले आहे.

मतदारसंघातील विहामांडवा येथील साखर करखान्यांच्या गळीत हंगाम शुभारंभा प्रसंगी केलेल्या भाषणात संदीपान भुमरे यांचे सूर काहीसे बदलले दिसले. भुमरे म्हणाले, आमच्यावर ५० खोके घेतल्याचा अन् गद्दारीचा हे दोन आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहेत. तिसरा आरोप नाही, की विकासकामांबद्दल कोणी बोलायला तयार नाही. अहो पन्नास खोके घेतल्याचा आरोप आमच्या ५० जणांवर करता, मग एकाकडे तरी ते सापडले का? एकतर ५० खोके घेतल्याचे सिद्ध करा, नाहीतर आरोप करणे बंद करा.

५० खोके घरात ठेवणे एवढे सोपे असते का? उगाच करायचे म्हणुन आरोप करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा मला पालकमंत्री म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्याने हे विकासकाम का झाले नाही, तो प्रकल्प का झाला नाही? याबद्दल जाब विचारला तर मला ते अधिक आवडेल.

पण यांच्याकडे दुसरे मुद्देच नाहीत. येवून जावून ५० खोके अन् गद्दार. आता हे कुठेतरी थांबल पाहिजे. साखर कारखाना आता सुरू झाला आहे, ऊस उत्पादकांना चांगला भाव देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. याआधीचे सगळे पैसै आम्ही दिलेले आहेत, कोणाचाही एक रुपया ठेवलेला नाही, असेही भुमरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com