Beed News : बीडमध्ये चाललंय काय ? आमदाराच्या धमकीनंतर कृषी अधिकारी रजेवर..

Marathwada : चार दिवसांपूर्वी कृषी सहाय्यकावर जीवघेणा हल्ला झाला होता. यामध्ये त्याचा हात, पाय फ्रॅक्चर झाले.
Mla Suresh Dhas News, Beed
Mla Suresh Dhas News, BeedSarkarnama

Marathwada : प्रशासन आणि त्यांतील अधिकाऱ्यांवर आपला वचक राहावा यासाठी राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी व त्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून धमकावणे, जीवे मारण्याची धमकी देणे, तर कधीकधी जीवघेणा हल्ला करण्यापर्यंत मजल गाठली जाते. (Beed News) गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील कृषी अधिकारी व त्यांचे कर्मचारी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली वावरतांना दिसत आहेत.

Mla Suresh Dhas News, Beed
Sanjay Shirsat On Ministry : मंत्रीपद माझ्या हक्काचे, मी मंत्री होणारच...

विधान परिषदेतील भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यात खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर जेजुरक यांना मारण्याची धमकी देण्यात आल्याची लेखी तक्रार त्यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली होती.(Beed News) मात्र राजकीय गुंड आणि नेत्यांच्या दबावामुळे दहशतीत असलेल्या जेजुरकरांनी प्रदीर्घ रजा टाकून यातून तुर्तास आपली सुटका करून घेतली आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी बीड शहरात भरदिवसा कृषी सहाय्यकावर जीवघेणा हल्ला झाला होता. (Marathwada) यामध्ये कृषी सहाय्यकाचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाले, त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर दोन दिवसानंतर विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस आणि कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांना मारण्याची धमकी दिली. याचा निषेध म्हणून कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन लेखी तक्रार देखील केली आहे.

या तक्रारीत विधान परिषद आमदारांच्या दबावाचा आणि प्रवृत्तीचा पाढाच वाचण्यात आला. कृषी अधिकाऱ्यांनी तक्रार दिली त्याच दिवशी आमदार सुरेश धस आणि जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्यात खडाजंगी झाली होती. यामुळे तणावात असलेल्या जेजुरकर यांनी रजा टाकून ते सुटीवर गेल्याचे समजते. ऐन खरिपाचा हंगाम तोंडावर असतांना कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होणे योग्य नाही. अशाने आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी संकटात सापडेल, अशी भावना सामान्यांकडून व्यक्त होत आहे.

काय आहे वाद ?

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपचे आमदार सुरेश धस आक्रमक झाले होते. दोन तास बीड जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या देवून होते. यावेळी धस आणि कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्यात खडाजंगी झाली होती. शिरूर तालुक्यातील पांगरी आणि जाधववाडी येथील साठवण तलावात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मावेजा मिळालेला नाही. या प्रश्नावर अनेकदा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

त्यामुळे धस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषी अधीक्षकांना जाब विचारत तुम्हाला शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचा अधिकार कोणी दिला? असं म्हणत संताप व्यक्त केला. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने आमदारांचा पारा अधिकच चढला, तुम्ही बाहेर व्हा असं आम्हाला म्हणणारे कोण ? असा प्रश्न धस यांनी पोलिसांना केला. तसेच कृषी अधिकारी व आपल्यात खडाजंगी नाही, तर शाब्दिक बोलाचाली झाली, असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com