
औरंगाबाद : शहरात महापालिका चौथ्या दिवशी पाणीपुरवठा का करू शकत नाही, याची बैठकीत चर्चा करून उपाय सुचविण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी खंडपीठाने Aurangabad High Court नेमलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले. तसेच जलवाहिन्या बदलून जीआय धातूच्या जलवाहिन्या टाकण्याच्या १९३ कोटींच्या योजनेचे काय झाले, याबाबतही बैठकीत चर्चा करावी, असेही निर्देश खंडपीठाने दिले.
या जनहित याचिकेवर आता ७ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. (Municipl Corporation) सध्या शहराला सहाव्या आणि सातव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात असल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त करून समितीला वरीलप्रमाणे निर्देश दिले. (Aurangabad)
मनपातर्फे ॲड. टोपे यांनी निदर्शनास आणून दिले की, जलवाहिन्या अत्यंत जुन्या झाल्या असून, त्यांचे आयुष्य संपले आहे. पाण्याच्या दाबामुळे जलवाहिन्या वारंवार फुटतात. त्या दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित करावा लागतो.
जुन्या जलवाहिन्याऐवजी जीआयच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम एक आठवड्यात पूर्ण होऊ शकेल, हा १९३ कोटींच्या योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. ६०४ `एमएलडी`च्या नवीन जलवाहिन्या टाकल्यास मनपा शहराला दररोज पाणीपुरवठा करू शकेल, असे महापालिकेतर्फे ॲड. संभाजी टोपे यांनी खंडपीठात तोंडी निवेदन केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.