Aurangabad : अखेर रेल्वे पीट लाईन मिळाली ; कराडांच्या प्रयत्नांना यश, दानवेंचा शब्द खरा ठरला

औरंगाबादला गाड्यांच्या देखभालीची व्यवस्था नसल्याने नवीन गाड्या सुरू करण्यात अडचणी येत होत्या आता औरंगाबाद वरून नवीन गाडी मंजूर करताना आता अडचण येणार नाही. (Marathwada)
Raosaheb Danve-Dr.Bhagwat Karad
Raosaheb Danve-Dr.Bhagwat KaradSarkarnama

औरंगाबाद : रेल्वे गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे पीट लाईन द्या, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील राजकीय पक्ष, संघटना, नेत्यांकडून होत होती. (Aurangabad) अखेर ती पुर्ण झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने औरंगाबादेत १६ डब्यांच्या पीट लाईनला हिरवा कंदील दिला असून त्यासाठी २९ कोटींचा निधी देखील दिला आहे.

योगायोगाने केंद्रात मराठवाड्याला दोन महत्वाची राज्यमंत्री पद मिळाली, एक अर्थ व दुसरे रेल्वे. पण कुरघोडीच्या राजकारणात रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी रेल्वे पीट लाईन आपल्या म्हणजेच जालना मतदारसंघात नेल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये नाराजी होती.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी देखील ही नाराजी पक्षात आपल्याला ज्येष्ठ असणाऱ्या दानवे यांच्याकडे बोलून दाखवली. तेव्हा एका कार्यक्रमात औरंगाबादला देखील दुसरी पीट लाईन मंजुर करणार, असा शब्द दानवे यांनी कराडांना दिला होता. (Marathwada) आज कराड यांच्या प्रयत्नांना यश आले, तर दानवे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला असेच म्हणावे लागेल.

औरंगाबादला १६ डब्यांची पीट लाईन मंजुर करण्यात आली असून त्यासाठी २९ कोटींचा निधी देखील दक्षिण-मध्य रेल्वेला देण्यात आला आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र रेल्वे मंत्रालयाकडून १० मे रोजी पाठवण्यात आले आहे. यामुळे औरंगाबादकरांच्या तब्बल दीड दशकांच्या संघर्षाला यश आले असून आता मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

औरंगाबादच्या पिट लाईनसाठी २९ कोटी ९४ लाख २६ हजार रूपये अंब्रेला योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. ही पीट लाईन एकूण सोळा डब्यांची असणार असून ती कॅमटेक तंत्रज्ञानाने बांधली जाणार आहे. या पीट लाईनच्या मंजुरीमुळे औरंगाबादहून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Raosaheb Danve-Dr.Bhagwat Karad
Shivsena : औरंगाबादकरांना पाणी न मिळण्याचे पाप भाजपचेच...

याचा थेट फायदा औरंगाबादच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला होणार असून देशातील अनेक मोठ्या शहरांसाठी औरंगाबाद वरून थेट रेल्वे सेवा उपलब्ध होऊ शकेल. शहरातून विशेषतः बंगळुरू,अहमदाबाद, अकोला-अमरावती-नागपूर, तिरूपती, वाराणसी-प्रयागराज, पाटना, बिकानेर-जोधपूर या आणि अनेक मोठ्या शहरांसाठी थेट रेल्वे सेवेची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

भविष्यात २४ डब्यापर्यंत विस्तार..

मात्र औरंगाबादला गाड्यांच्या देखभालीची व्यवस्था नसल्याने नवीन गाड्या सुरू करण्यात अडचणी येत होत्या . या नवीन पीट लाईनच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला औरंगाबाद वरून नवीन गाडी मंजूर करताना आता अडचण येणार नाही. मंजुर करण्यात आलेली पीट लाईन सुरूवातीला सोळा डब्यांची असणार आहे. भविष्यात तिचा विस्तार डब्यापर्यंत करता येईल.

यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने नमुद केल्याप्रमाणे एकनाथ नगर येथील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करावे लागणार आहे, त्यानंतरच पिटलाईन २४ डब्यांची करता येईल. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला असून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे आभार मानले आहेत.

अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी स्वतः रेल्वे अधिकारी आणि मराठवाडा रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन औरंगाबाद स्टेशनवरील पीट लाईनच्या जागेची पाहणी मागे केली होती. आता पीट लाईनच्या कामासाठीचे टेंडर कधी निघते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com