Ashok Chavan : अजूनही वेळ गेलेली नाही, औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक घ्या..

१६ सप्टेंबर रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या पुर्वसंध्येला ही बैठक घेणे शक्य होते. पण सरकारकडून अद्याप तरी त्याबद्दल काही हालचाली होतांना दिसत नाही. (Ashok Chavan)
Mla Ashok Chavan News, Aurangabad
Mla Ashok Chavan News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : येत्या १७ सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. आघाडी सरकारने मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी दर दोन वर्षांनी औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक घेऊन महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरवले होते. कोरोनामुळे मंत्रीमंडळाची बैठक इतर ठिकाणी घेणे शक्य नव्हते. पण आता मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचा अमृत महोत्सव लक्षात घेऊन (Aurangabad) औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक घ्यावी, अशी विनंती माजीमंत्री आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

अशोक चव्हाण यांनी या संदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध करत शिंदे-फडणवीस सरकारला बैठक घेण्याचे आवाहन केले आहे. अशोक चव्हाण म्हणाले, आघाडी सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी (Marathwada) मराठावाड्यातील विकासाचे प्रश्न तातडीने सोडवून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी औरंगाबादेत मंत्रीमंडळाची एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीत मी देखील होतो.

परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि आघाडी सरकारच्या इतर निर्णयांना जशी स्थगिती देण्यात आली, तशीच औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठक घेण्याच्या निर्णयाला देखील देण्यात आली आहे की काय? असा प्रश्न पडतो. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर नवे सरकार औरंगाबादेत बैठक घेईल आणि मराठवाड्यातील विकास कामांना गती देईल, अशी अपेक्षा होती.

१६ सप्टेंबर रोजी म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या पुर्वसंध्येला ही बैठक घेणे शक्य होते. पण सरकारकडून अद्याप तरी त्याबद्दल काही हालचाली होतांना दिसत नाही. मराठवाडा महाराष्ट्रात विनाअट सहभागी झाला होता. तेव्हा प्रामुख्याने या भागाचा अनुशेष दूर करणे हा विषय होता. त्यासाठीच औरंगाबादेत मंत्रीमंडळाच्या बैठका घेऊन मराठवाड्यातील विकासकामे मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Mla Ashok Chavan News, Aurangabad
Shivsena : शहाजीबापू माझ्यासाठी खुर्चीचं राहू द्या, तुम्हाला मी मातोश्रीकडून मोठी खुर्ची मिळवून देतो..

परंतु शिंदे-फडणवीस सरकारकडून औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठक घेण्या संदर्भात कुठल्याच हालचाली होतांना दिसत नाहीयेत. माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, की अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी नियोजन करावे आणि औरंगाबादेत मंत्रीमंडळाची बैठक घ्यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com