Ashok Chavan : काॅंग्रेसच्या रेल्वे मंत्र्यांनी ब्राॅड गेज केले, तुम्ही एवढं तरी करा; दानवेंना टोला..

Marathwada Sahitya Sammelan : तर रेल्वेमंत्री म्हणून तुम्ही खूप काही केले असे म्हणता येईल
Ashok Chavan-Raosaheb Danve News, Aurangabad
Ashok Chavan-Raosaheb Danve News, AurangabadSarkarnama

Marathwada Politics : घनसावंगी येथील ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात काॅंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी आज जोरदार फटकेबाजी केली. Congress राजकारणातील दशा आणि दिशा या परिसंवादात बोलतांना चव्हाणांनी देशातल्या आणि राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतांनाच मराठवाड्यातील आतापर्यंत झालेल्या रेल्वे विकासात काॅंग्रेसच्या काळातील रेल्वे मंत्र्याचे कसे योगदान होते हे अगदी नावासह सांगितले.

Ashok Chavan-Raosaheb Danve News, Aurangabad
Pankaja Munde : माफी मागितल्यावर माफ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती..

हे सांगत असतांना त्यांनी भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना देखील चिमटा काढला. अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, मराठवाड्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही हे जरी सत्य असले तरी काहीच झाले नाही असेही म्हणता येणार नाही. मराठवाड्याला सत्तेत संधी मिळाली, मुख्यमंत्रीपदही मिळाले पण ते कधी दोन वर्ष, कधी अडीच वर्ष असे होते.

शिवाय राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या दुसऱ्याच्याच हातात असायच्या. त्यामुळे मराठवाड्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. पश्चिम महाराष्ट्रात विकास झाला असला तरी तिथेही बेरोजगारीचा प्रश्न आहेच, पण मराठवाड्याच्या तुलनेत कमी आहे. मराठवाड्यातील रेल्वेचा विषय घेतला तर आपल्याकडे निजामकाळापासून मीटरगेज होते, आता ब्राॅडगेज झाले आहे. काॅंग्रेसच्या काळात झालेल्या रेल्वे मंत्र्यांनी मराठवाड्यातील रेल्वेच्या विकासात मोठे योगदान दिले.

त्यासाठी येथील रेल्वे संघर्ष समिती, त्यांचे नेते, कार्यकर्त्यांनी देखील खूप प्रयत्न केले. अजूनही आपल्याकडे सिंगल लाईन आहे, तिचे दुहेरीकरण करणे गरजेचे आहे. माझी आताच्या रेल्वे मंत्री दानवेंना एकच विनंती आहे. मराठवाड्याच्या रेल्वेसाठी एक करा, एकतर आम्हाला आरामदायक प्रवास करता यावे यासाठी चांगले आणि स्वच्छ डबे द्या.

दुसरं म्हणजे आमचा हा मराठवाडा विभाग दक्षिण रेल्वेशी जोडला गेलेला आहे. आमचं सगळं काम हे मुंबईशी असते, हैदराबाद, तेलंगाणाशी आमचा काही संबंध येत नाही. तेव्हा हा भाग दक्षिण रेल्वेतू मध्य रेल्वेत म्हणजेच मुंबईला जोडण्याचा एक प्रशासकीय निर्णय घ्या. तुमच्या एका सहीने ते होऊ शकते. एवढे जरी केले तर रेल्वेमंत्री म्हणून तुम्ही खूप काही केले असे म्हणता येईल, असा टोला देखील चव्हाण यांनी दानवेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com