Aurangabad : जलसंधारण विभागाचे वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी ऋषीकेश देशमुख यांनी एका कंत्राटदाराला सव्वा कोटीच्या कामाचे बील काढण्यासाठी ७.५ टक्के प्रमाणे साडेआठ लाखांची लाच मागितली. संबंधित कंत्राटदाराने मध्यस्थामार्फत लाच देण्याचे कबुल केले, पण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption News) तक्रार करत माहिती दिली.
उपविभागीय अधिकाऱ्यासाठी मध्यस्थामार्फत लाच स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहाथ पकडले आणि उपविभागीय अधिकारी ऋषीकेश देशमुख हे देखील जाळ्यात अडकले.(Aurangabad) या कारवाईने एकच खळबळ उडाली असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. (Marathwada) या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने सापळा रचत देशमुख यांना साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ऋषिकेश देशमुख यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौडेश्वरी कंट्रक्शन या परभणी येथील कंपनीने कोल्हापुरी बंधा-याचे गवळी काम केले होते. त्याचे बील १८ लाख आणि पूर्णा तालुक्यातील कामाचे १ कोटी १९ लाख असे एकूण १ कोटी ३७ लाख रुपये बाकी होते. हे बील काढण्यासाठी कंत्राटादार कंपनीचे सुनील कुशिरे यांच्यासाठी साडेसात टक्के प्रमाणे ८ लाख ३ हजार २५० रुपये मागितले.
या शिवाय स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून ५० हजार असे एकूण ८ लाख ५३ हजार २५० रुपयांची मागणी देशमुख यांनी केली होती. जलसंधारण विभागाच्या औरगाबाद कार्यालयासमोर देशमुख आणि जलसंधारण महामंडळ कार्यालयात लिपिक भाउसाहेब दादाराव गोरे या दोघांना लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.