जालना : राज्यात सध्या ४० हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे हा उपाय असून त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावे लागतील, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिला.
जालना येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि सरकार, आरोग्य विभागाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. टोपे म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. (Corona) नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत, हे निर्बध रविवारी (ता.९) रात्रीपासून लागू होणार आहेत. (Marathwada) त्यामुळे या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे.
सध्या राज्यात रोज ४० हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल येथे निर्बंध लावले जातील. सध्या राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढली असली तरी त्याचे प्रमाण अत्यअल्प आहे. कुठल्याही परिस्थितीत गर्दी होऊ नये यासाठी सरकार, प्रशासन प्रयत्नशील आहे.
बार, दारूची दुकाने ही सध्या सुरू असली तरी तिथेही जर गर्दी होऊ लागली तर ते देखील बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. धार्मिक स्थळांच्या बाबतीत देखील अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अद्याप ती सुरू आहेत.
त्यामुळे नागरिकांना तिथेही जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा आहे त्या निर्बंधांमध्ये वाढ करून धार्मिक स्थळांच्या बाबतीत देखील सरकारला वेगळा विचार करावा लागेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.