
Shivsena : गद्दारांनी कितीही दावे करू देत, ते वाचणार नाहीत. आज ना उद्या त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल आणि त्यांना घरी जावेच लागेल, असा इशारा (Yuvasena) युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिला. औरंगाबाद रांजणगांव येथे आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दावोसमध्ये झालेले करार, निवडणुक आयोगासमोर सुरू असलेला शिवसेना-शिंदे गट वाद व इतर विषयांवर आपले मत व्यक्त केले. आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लोखो कोटींची गुंतवणूक दावोसमधील करारांच्या माध्यमातून राज्यात आणल्याचा दावा केला आहे.
या संदर्भात नेमके कोणते करार, कुठल्या कंपन्यांबरोबर या सरकारने केले आहेत, याची माहिती मी गोळा करतोय, त्यावर अभ्यास झाला की स्वतंत्र पत्रकार परिषद घेवून मी भूमिका मांडणार आहे. राहिला प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण कोणाचा? तर तो कायम शिवसेनेचाच राहणार, गद्दारांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण कदापी मिळणार नाही.
हे गद्दार लवकरच घरी जाणार आहेत. आज ना उद्या त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणारच आहे, त्यांच्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. खऱ्या अर्थाने त्यांना व्हिआरएस घ्यायला लावला असे म्हणावे लागेल. कारण हे गद्दार आता पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत.
हिंदुत्वाच्या मुद्यावर पक्षाशी गद्दारी करून बाहेर पडले आणि आता सत्ता असूनही हिंदू जनजागृती अभियान काढतायेत, मग हे कशासाठी? असा टोला देखील ठाकरे यांनी शिंदे सरकारला लगावला. या पेक्षा कश्मिरी पंडितासांठी अभियान राबवा, अजूनही ते तिकडे यातना भोगतायेत, असेही आदित्य ठाकरे यांन सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.