
Aurangabad : मागेल त्याला विहीर आणि गायगोठा सारख्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देवू, अशी ग्वाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली. सिल्लोड येथील रोहयो अंतर्गत विहीर व गायगोठा कार्यारंभ आदेश वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. (Marathwada) कृषी विभागाच्या विहीर , गायगोठा व इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी (Farmers) शेतकऱ्यांनी संबंधित विभागात प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन सत्तार यांनी केले.
रोहयो योजने अंतर्गत तालुक्यातील ६७५ लाभार्थ्यांना विहीर तर १०४ शेतकऱ्यांना गायगोठा योजनेच्या कार्यारंभ आदेशाचे वितरण सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. तालुक्यात पहिल्यांदा ७७९ इतक्या संख्येने रोहयोच्या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला. दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी आतापासून रोहयोच्या विहीर, गायगोठा यासह इतर योजनेसाठी प्रस्ताव दाखल करावेत. प्रस्ताव दाखल केलेला एकही पात्र शेतकरी योजने पासून वंचित राहणार नाही, असा विश्वास देखील सत्तार यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान यासह पीकविमा आणि नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. मतदारसंघातील शेतकरी दोन पिके घेणारा निर्माण व्हावा यासाठी सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही सत्तार यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.