Abdul Sattar : कृषीमंत्र्यांचा एक फोन अन् महावितरणची वसुली मोहिम गुंडाळली..

नुकसानीची व पिकविम्याच्या रक्कम खात्यावर वर्ग होताच शेतकऱ्यांनी वीज देयकाच्या थकीत रक्कमेपोटी पाच हजार रुपये महावितरणकडे तातडीने भरावेत. (Abdul Sattar)
Minister Abdul Sattar News, Aurangabad
Minister Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

सोयगाव : थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणकडून तालुक्यात हाती घेण्यात आली होती. Affected Farmers परंतु शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती आणि खरिपाच्या पिकांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत वीज पुरवठा खंडित करू नका, असे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

Minister Abdul Sattar News, Aurangabad
Aimim : ठाकरे-आंबेडकरांची एकमेकांना साद, तर एमआयएमची पुन्हा वंचित सोबत जाण्याची इच्छा..

माळेगाव (पिंप्री) गावात आलेले असतांना एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेने अब्दुल सत्तार यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. (Farmers) शेतकऱ्यांची दुरावस्था पाहून सत्तारांनी तिथूनच थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. (Abdul Sattar) शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत एकही रोहित्र वरून शेती पंपाचा वीजपुरवठा खंडित करू नका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

कृषीमंत्र्यांनीच आदेश दिल्यामुळे महावितरणची मोहिम अवघ्या दहा मिनिटांत त्यांना गुंडाळावी लागली. अतिवृष्टी, सततचा आणि परतीच्या पावसाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. कृषीमंत्र्यांच्या सोयगांव मतदारसंघात देखील या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच रब्बीच्या हंगामासाठी प्रयत्न करावेत तर जळलेले रोहित्र आणि थकबाकीमुळे महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईमुळे शेतकरी हताश झाला आहे.

रोहित्र जळल्यानंतर देयक भरूनही शेती पंपाचे रोहित्र तीन तीन महिने मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे केल्या. त्यामुळे संतापलेल्या सत्तारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट फोन वरून धारेवर धरले. तातडीने शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून द्या व त्याबाबतचा अहवाल मला सादर करा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीच्या नुकसानीचे व पीकविम्याची रक्कम वर्ग होईपर्यंत सोयगाव तालुक्यातील एकही रोहितरावरील वीज जोडणी खंडित करू नका, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. अतिवृष्टीच्या नुकसानीची व पिकविम्याच्या मदतीची रक्कम खात्यावर वर्ग होताच शेतकऱ्यांनी वीज देयकाच्या थकीत रक्कमेपोटी पाच हजार रुपये महावितरणकडे तातडीने भरावेत, असे आवाहन देखील सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले. त्याआधी जर कोणाच्या शेती पंपाची वीज खंडित केली तर थेट मला फोन करा, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com