काँग्रेसला पुन्हा फडणवीसांची मनधरणी करावी लागणार?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
Devendra Fadanavis - Balasaheb Thorat
Devendra Fadanavis - Balasaheb ThoratSarkarnama

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसचे जेष्ठ आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हि निवडणूक जाहिर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रक जारी करुन याबाबतची घोषणा केली आहे. या निवडणूकीसाठी ९ ते १६ नोव्हेंबर अर्ज भरण्याची मुदत असणार आहे तर १७ नोव्हेंबर रोजी अर्जाची छानणी होणार आहे. त्यानंतर २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबरला यासाठी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने याठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Devendra Fadanavis - Balasaheb Thorat
कॉग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन

काँग्रेस या जागेसाठी विधानपरिषदेवर कुणाला पाठवणार?

काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे इथून आता काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र काँग्रेसकडून सचिन सावंत यांना या जागेवरुन सभागृहात पाठवणार असल्याची चर्चा आहे. सचिन सावंत गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार परिषदा, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील पॅनल चर्चांच्या माध्यमांतून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडत आहेत व विरोधकांचे हल्ले परतावून लावत आहेत. मात्र अलिकडेच ते पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडे देण्यात आल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामाही दिला होता. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या माध्यमातुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे.

Devendra Fadanavis - Balasaheb Thorat
पटोले आणि थोरात यांची विनंती मान्य.. रजनी पाटील बिनविरोध राज्यसभेवर

काँग्रेसला पुन्हा फडणवीसांची मनधरणी करावी लागणार?

निधनानंतर जाहिर झालेल्या जागांवरील पोटनिवडणूका या बहुतांश वेळा बिनविरोध होत असतात. मात्र नुकत्याच झालेल्या राज्यसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. सोबत अखेरच्या काही दिवसापर्यंत हा अर्ज माघारी न घेण्यावर भाजपचे नेते ठाम होते. मात्र त्यानंतर मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपकडून संजय उपाध्याय यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला होता. त्यामुळे आता जर भाजपने विधानपरिषदेसाठी आपला उमेदवार उतरवला तर काँग्रेसच्या नेत्यांना बिनविरोधसाठी पुन्हा एकदा फडणवीसांची मनधरणी करावी लागण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com