अन् कणकवलीतील घडामोड ऐकून नारायण राणे अंघोळ करता करता थांबले...

कणकवली बालेकिल्ल्यातून निवडून आलेल्या विठ्ठल देसाईंचे नारायण राणेंनी (Narayan Rane) मनमोकळे कौतुक केले आहे.
 Narayan Rane

Narayan Rane

Sarkarnama

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजप (BJP) नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिद्धीविनायक पॅनेलचे 11 उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) 8 जागा मिळाल्या आहेत. या विजयावर नारायण राणेंनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.

राणेंनी आपल्या कणकवली बालेकिल्ल्यातून निवडून आलेल्या विठ्ठल देसाईंचे मनमोकळे कौतुक केले आहे. चिठ्ठीवर निवडून यायला मोठे नशीब लागते, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली. सकाळी चिठ्ठी टाकली जात होती, त्यावेळी मी अंघोळ करत होतो. नेमकं काय होणार हे ऐकण्यासाठी मी तर अंघोळ करता करता थांबलो होते, अशीही माहिती राणेंनी दिली.

या वेळी राणे म्हणाले की, ही सत्ता माझी नाही तर भाजपची आहे. जिल्ह्यातील जनता आणि देवदेवता यांच्यामुळे सत्ता आली आहे. नितेश राणे, निलेश राणे यांची मेहनत आणि त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली साथ यामुळे आमचा विजय झाला आहे. आम्ही अकलेचा वापर करून विजय मिळवला आहे. अकलेचा वापर करणाऱ्यांना देवदेवतांची साथ मिळाली आहे. विजयाचे हे श्रेय निलेश, नितेश यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे.

<div class="paragraphs"><p> Narayan Rane</p></div>
घोळात घोळ संपला! अखेर समाजवादी अत्तरवाल्या जैनवर छापे पडलेच

या निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) आणि भाजप (BJP) दोघांमध्ये चुरस होती. शिवसेनेचे (Shivsena) सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंचरच नितेश राणे अडचणीत आले आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. कणकवली तालुक्यातून सावंत आणि भाजपचे विठ्ठल देसाई या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे शालेय विद्यार्थी देवेश नरेंद्र येडके याने चिठ्ठी काढली. या चिठ्ठीमध्ये भाजपचे विठ्ठल देसाई हे विजयी झाले.

<div class="paragraphs"><p> Narayan Rane</p></div>
जिल्हा बँकेतील विजयावर नारायण राणे म्हणाले, हा तर अकलीने मिळवलेला विजय!

जिल्हा बँकेसाठी कणकवली तालुक्यात १६५ पैकी १६१ इतके मतदान झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोठ्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार जण मतदार मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com