Sanjay Raut News : पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणी राऊतांचे शिंदे गटातील मंत्र्यावर गंभीर आरोप; फोटोच केला ट्वीट

Konkan News : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Sarkarnama

Konkan News : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या हत्याप्रकरणावरून पत्र लिहिले आहे. तसेच राऊत यांनी ट्विट करत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावर भाष्य करताना शिंदे गटातील नेते मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा एक फोटो ट्वीट केला आहे.

शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवालही त्यांनी केला आहे. राऊतांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की ''व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा खून राजकीय आहे. नाणार परिसरात नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बेनामी जमीन खरेदी केली आहे. त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut News
By Election News : ..म्हणून चिंचवड, कसबा पेठच्या 'एक्झिट पोल'वर २७ फेब्रुवारीपर्यंत बंदी

दरम्यान, ''कोकण विभागातील पत्रकारास ज्याप्रकारे संपवण्याचा आणि जो अपघात दाखवला गेला. यामागे कोण आहे, मास्टरमाईंड कोण आहे हे कळले पाहिजे. हे सरकार, पोलीस यंत्रणा काय करत आहेत?, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

सगळे झोपा काढता आहेत काय, या मागील वस्तूस्थिती कळली पाहिजे. जर महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावे? कायदा, सुव्यवस्था राज्यात राहणार? या सगळ्याच गोष्टीचा निषेध करतो. याचा तपास लागलाच पाहिजे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Sanjay Raut News
Shashikant Warise : वारीसे मृत्यू प्रकरणी शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय ; पोलिसांना दिला 'हा' आदेश

याशिवाय, ''याबद्दल उद्या २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. हे सरकार आल्यापासून घडत आहेत, हे सरकारचे अपयश आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे सरकारला फटकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com