माझी सुरक्षा कमी करुन दीपक केसरकरांना द्या: वैभव नाईकांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Vaibhav Naik News| दीपक केसरकरांनी भान ठेवून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी.
Vaibhav Naik
Vaibhav Naik

कणकवली : निवडणूका जवळ आल्‍या की दीपक केसरकरांना दहशतवाद आठवतो. त्यांची सुरक्षा कुणी कमी केली नाही की त्‍यांच्या विरोधात आम्‍ही घोषणा दिल्‍या नाहीत. तरीही केसरकरांना सुरक्षा कमी पडत असेल तर माझी वैयक्‍तिक सुरक्षा केसरकर यांना द्यावी, असे पत्र कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांना दिले असल्‍याची माहिती समोर आली आहे.

कणकवलीतील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वैभव नाईक बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना गृहराज्यमंत्री केलं. त्यावेळी कुठे गेली होती दहशत?", असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या अडीच वर्षात दिपक केसरकरांना दहशत दिसली नाही का, असही वैभव नाईक यांनी विचारले आहे.

Vaibhav Naik
शिंदे नेतेपदी कायम, तूर्तास कारवाई नाही ; शिवसेनेची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका

पक्षांतराची वेळ आली की आमदार दीपक केसरकर आता दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतात. पण सिंधुदुर्गात नारायण राणेंचा दहशतवाद कोणी मोडून काढला आणि शिवसेना पुन्हा ताठ मानेने कोणी उभी केली, हे संपूर्ण सिंधुदुर्गातील लोकांना माहिती आहे. नारायण राणे यांच्या विरोधात जाऊन आम्ही जीव धोक्‍यात घालून उमेदवारी अर्ज भरला. झेंडे लावायला कोणी नसतानाही कणकवलीत शिवसैनिक उभे केले. माझ्यावर दोनदा प्राणघातक हल्‍ल्‍याचा प्रयत्‍न झाला. राणेंच्या गाड्या सतत पाळतीवर असायच्या, असे असतानाही आम्ही कधी केसरकर यांच्याप्रमाणे कधीच दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला नाही, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.

आमदारांनी बंडखोरी करुनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आमदाराची सुरक्षा वाढवलेली किंवा कमी केली नाही. त्यांना अजून सुरक्षा हवी असल्यास माझी सुरक्षा कमी करावी आणि त्यांना पुरण्यात यावी यासाठी मी स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेत आले तेव्हा ते राणेंच्या दहशतीबाबत ओरडत होते आणि आता शिंदे गटात सामील होतानाही दहशतीचा हा मुद्दा आणत आहेत. सिंधूदुर्गात केसरकर यांना शिवसेनेपासून त्यांना कोणताही धोका नाही. पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भान ठेवून टीका करावी. त्‍यामुळे दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्यापूर्वी विचार करावा. कारण स्वत: उद्धव ठाकरे यांनीच पुढील पाच वर्षे दीपक केसरकरांकडे राज्‍याच्या सुरक्षिततेची जबाबदारी दिली होती. त्‍यावेळी केसरकरांना शिवसेनेतील दहशतवाद दिसला नाही आणि आता शिंदे गटात गेल्‍यावर त्यांना दहशतवाद दिसायला लागला आहे, असा टोलाही वैभव नाईक यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com