संजय राऊत थोडक्यात वाचले, अन्यथा..

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे, अशी टीका राणे यांनी केली.
sanjay raut, narayan rane
sanjay raut, narayan ranesarkarnama

सिंधुदुर्ग : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

"राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत हे अवघ्या एका मताने जिंकून आले आहेत. ते या निवडणुकीत काठावर पास झाले आहेत. थोडक्यात ते आमच्या हातातून वाचले. अन्यथा शिवसेनेचा उमेदवार जिंकून आला नसता," असा दावा भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी केला. राणे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाहीत, हेच या निकालातून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हायला हवे, अशी टीका राणे यांनी केली.

राज्यसभा निवडणूक निकालानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल कौतुक केलं. पवारांच्या या विधानाचा आधार घेत नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन उद्धव ठाकरे यांनी शिकावे, असा खोचक सल्ला राणेंनी दिला आहे.

sanjay raut, narayan rane
rajya sabha : मत बाद ठरविल्याने शिवसेनेचे सुहास कांदे उच्च न्यायालयात जाणार

नारायण राणे म्हणाले, "राज्यसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. फडणवीसांनी माणसे जपली, आमदारांचा विश्वास संपादन केला, असे पवार म्हणाले. खऱ्याला खरे म्हणणाऱ्या शरद पवारांकडून उद्धव ठाकरे यांनी शिकावे, पवारांकडून ठाकरेंनी बोध घ्यावा. मात्र, ठाकरेंचा स्वभाव माहित असल्यामुळे ते सत्य स्वीकारतील, असं वाटत नाही,"

sanjay raut, narayan rane
आघाडीची मतं फुटली नाहीत, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली : शरद पवार

"निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढावली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव आहे," असे राणे म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्या पाहिजे, आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे राज्यसभेची ही निवडणूक भाजपने जिंकली," असे राणेंनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com