नारायण राणेंनी सत्तेसाठी गद्दारी केली; शिवसेना आमदाराचा आरोप

भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्विकारत नाहीत
MLA Vaibhav Naik
MLA Vaibhav Naik

सिंधुदुर्ग : '' राणेंनी वेळोवेळी गद्दारी केल्याने गद्दारीवर उपदेश देण्याचा त्यांना अधिकार नाही, '' असे म्हणत सिंधुदुर्गचे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhav Naik) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. शिवसेना (Shivsena) आणि नारायण राणे यांच्यातील वैर संपुर्ण महाराष्ट्राला माहित आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाही. मात्र वैभव नाईकांच्या या व वक्तव्याने पुन्हा मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- काय म्हणाले वैभव नाईक?

वैभव नाईक यांनी नारायण राणे आणि त्यांच्यामुलांवर गंभीर आरोप केले आहे. ''केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे घेऊन भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकांमध्ये गद्दारी केल्यास सोडणार नाही बघून घेईन अशा भाषेत त्यांना धमकी देत आहेत. मात्र नारायण राणेंनीच वेळोवेळी गद्दारी केली असल्याने गद्दारी या विषयावर कार्यकर्त्यांना धमकावण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही, असे वैभव नाईकांनी म्हटले आहे.

MLA Vaibhav Naik
सासऱ्याचा रस्त्यात केला खुन : घरी जाऊन केला स्वयंपाक, मुलांना जेवूही घातले

याचबरोबर, नारायण राणेंनी सत्तेसाठी सुरुवातीला शिवसेनेबरोबर गद्दारी करत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. काँग्रेस मध्येही त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढला. त्याला वर्ष होण्याअगोदर स्वतःच्या कार्यकत्यांबरोबर गद्दारी करून राणे ईडीची कारवाई टाळण्यासाठी आणि सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झाले. या कालावधीत राणेंनी त्या त्या पक्षातील अनेकांशी गद्दारी करूनच पदे मिळविली. त्यामुळे वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या राणेंनी गद्दारी या विषयावर बोलू नये आणि कोणाला उपदेशही देऊ नये, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

''भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नारायण राणेंबरोबर नाहीत, हे हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राणेंच्या मुलांना स्वीकारत नाहीत, त्यामुळेच भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावून त्यांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न राणे करत असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी केला आहे.

तर, भाजपमध्ये दाखल झालेले राणे कुटुंबीय हे भाजपच्या भल्यासाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी दाखल झाले आहे. सत्ता असेल त्या पक्षात प्रवेश करून राणे स्वतः सत्तेचा उपभोग घेऊन आपल्या दोन्ही मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी धडपडत आहेत हे आता लपून राहिले नाही. राणेंची दहशत सिंधुदुर्गच्या जनतेने याआधीही मोडीत काढली आहे. आता भाजप कार्यकर्त्यांना धमकावून राणे पुन्हा जिल्ह्यात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जिह्यातील जनता राणेंची दहशत खपवून घेणार नाही, असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे.

याचवेळी, आगामी निवडणुकीत जनता व कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत हे स्पष्ट होईल. रत्नागिरी जिल्हा बँक निवडणुकीत राणेंचा सुपडा साफ झाला. तेथील मतदारांनी राणेंना त्यांची जागा दाखवली. सिंधदुर्गमध्येहीया ची पुनरावृत्ती होईल," असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com