Bhaskar Jadhav आज कोणावर तोफ डागणार?

Bhaskar Jadhav | घरावर हल्ला झाल्यानंतर भास्कर जाधव आज पहिल्यांदाच चिपळूणमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत
Bhaskar Jadhav |
Bhaskar Jadhav |

चिपळूण : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. त्यानंतर आज पहिल्यांदा ते चिपळूणच्या दौऱ्यावर जात आहेत. यानिमित्त भास्कर जाधव चिपळूणमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असून त्यांनी तेथील स्थानिक शिवसैनिकांना जमण्याचे आदेश दिले आहेत. कुडाळ, नवीमुंबई, या ठिकाणाहून मोर्चे आणि सभा झाल्यानंतर चिपळूणमध्ये त्यांची सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. वैभव नाईकांच्या (१८ ऑक्टोबर) समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याच रात्री भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला होता. जाधव हे मोठे राजकीय नेते आहेत. जिल्ह्यात त्यांचे मोठे प्रस्थ आहेत. पण त्यांच्या घरावर असा हल्ला करण्यात आल्याने परिसरात चर्चा सुरू आहेत. त्यात आज भास्कर जाधव यांच्या चिपळून दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागला आहे.

Bhaskar Jadhav |
भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला, अज्ञातांनी दगड-बाटल्या फेकल्या : राजकीय संघर्ष घरापर्यंत!

भास्कर जाधव यांनी नारायण राणेंची नक्कल करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. “नारायण राणेंचं कायम एकच भाषण असतं. ‘मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली’.आहो नारायण राणे.. शिवसेना संपली, ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? मराठी माणूस संपला, शिवसेनेने काही केलं नाही. पण आता बाळासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं. त्यावेळी तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेनं काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करून मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असा सणसणीत टोला भास्कर जाधवांनी नारायण राणेंना लगावला होता.

त्याच रात्री भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला होता. भाजप आणि मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली. भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्यानंतर नितेश राणे म्हणाले होते की, "खालच्या पातळीवरून बोलणार असाल तर कार्यकर्ते त्या त्या पद्धतीने रिअॅक्शन देणारच… कुणाकुणाला थांबवणार?" या पद्धतीने राणेंच्या विरोधात बोलणार असाल तर कार्यकर्ते शांत बसत नाहीत. या राज्यात नारायण राणेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. विरोधात बोलल्यावर कार्यकर्ते कुठपर्यंत शांत बसणार ? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राणे यांच्यातला संघर्ष आणखी जास्त विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com