Uddhav Thackeray in Barsu : महाराष्ट्राला 'राख' अन् गुजरातला 'रांगोळी'; ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Barsu Refinery : तेलशुद्धीकरण प्रकल्प बारसू-सोलगाव परिसरात लादला जातोय
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Maharashtra and Gujrat : राज्य सरकार बारसू परिसरात तेलशुद्धीकरणाचा प्रकल्प लादू पाहत आहे. लोकांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला जात आहे. एकीकडे प्रकल्प चांगला म्हणायचे आणि दुसरीकडे विरोध करणाऱ्यांना तडीपार करायचे, असे दडपशाहीचे धोरण बारसूत राबविले जात आहे.

या प्रकल्पांतर्गत परिसरातील कातळशिल्पही येत असल्याचे अलिकडेच समजले. या कातळशिल्पांबाबत युनिस्कोला पत्र पाठविले. त्यानंतर रिफायनरीबाबत केंद्राला पत्र दिले आहे. ज्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे, निसर्गाचे नुकसान होईल ते प्रकल्प महाराष्ट्रला आणि चांगले प्रकल्प गुजरातला नेले. याचा अर्थ महाराष्ट्र्ला राख आणि गुजरातला रांगोळी असे धोरण केंद्र आणि राज्य सरकार राबवित असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : राज्य सरकारची खुर्ची डगमगायला लागली; बारसुतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बारसू येथे रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिक लोक विरोध करीत असतील तर शिवसैनिक म्हणून मीही विरोध करणार, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.

ठाकरे म्हणाले, "राज्य सरकार लोकांचा विरोधाला न जुमानता येथे प्रकल्प करत आहेत. त्यासाठी मी पाठविलेल्या पत्राचा वारंवार उल्लेख केला जात आहे. मात्र माझ्या काळातील चांगेल प्रकल्प या सरकारने बाहेर जाऊ दिले. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातला वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस बल्कड्रग पार्क असे चांगेल प्रकल्प गेले. आता बारसूतील प्रकल्प कोकणात लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या काळातील राज्यात आलेले सर्व प्रकल्प पुन्हा आणा आणि गुजराला रिफायनरी प्रकल्प जाऊद्या. या सरकारच्या धोरणातून महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाट्याला राख आणि गुजरातला रांगोळी मिळत आहे. या प्रकल्पाला लोकांचा विरोध असेल तर शिवसैनिक म्हणून माझाही विरोधच असणार आहे."

Uddhav Thackeray
Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी संपली, वज्रमुठ सुटली ; पण उद्धव ठाकरेंच्या डोळ्यावर पट्टी..

रिफायनरी परिसरात येणाऱ्या कातळशिल्पाबाबत अलिकडेच माहिती मिळाल्याची कबुलीही ठाकरे यांनी यावेळी दिली. ठाकरे म्हणाले, "येथील कातळशिल्पाबाबत (Konkan) यापूर्वीच कल्पना होती. त्यामुळेच या कातळशिल्पाबाबत प्रस्ताव युनोस्कोकडे दिला आहे. आता ही जागाही वादग्रस्त प्रकल्पांतर्गत येते याबाबत मला आताच समजले. या पठारावर अनेक कातळशिल्प आहेत. ही कातळशिल्पे प्रागैतिहासिक किंवा अश्मयुगीन काळातील असावीत. रिफायनरीमुळे या कातळशिल्पांना धोका पोहचणार आहे. रिफायनरीबाबत पत्र दिले तसेच कातळशिल्पाबाबतही पत्र युनिस्कोलाही दिले आहे."

Uddhav Thackeray
Satara BJP : उदयनराजेंना लवकरच मोठी जबाबदारी देणार... अजयकुमार मिश्रा

बारसू (Barsu) परिसरात अनेक परप्रातियांच्या जमिनी आहेत. त्यामुळे येथे काहीतरी कट शिजत असल्याचा आरोपही ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "हे सरकार उपऱ्यांसाठी दलाली करत आहे. येथे अनेकांच्या जमिनी आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होण्यासाठी या प्रकल्प रेटला जात आहे. त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून लाठीचार्ज केला जात आहे. यातून हे सरकार (State Government) सामान्यांचे नसून दलालांसाठी काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकल्प झाला नाही तर घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना माघारी कराव्या लागतील. त्यामुळे दलालांसह संबंधितांचे नुकसान होईल. त्यातून कसल्याही स्थितीत हा प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सरकार करीत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com