`अरे बाबा तुमचं लवकर कधी येणार`, मंत्रीमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा टोला..

फडणवीस यांनी सगळं माहित असून देखील अजित पवार राजकारणासाठी नुसती डायलाॅगबाजी करत असल्याचा पलटवार केला आहे. (Ajit Pawar)
Cm Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadanvis News
Cm Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadanvis NewsSarkarnama

मुंबई : अरे बाबा मंत्रीमंडळ विस्ताराचं विचारलं की सांगता लवकर होणार, लवकर होणार, पण तुमचं लवकर कधी येणार, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. एका कार्यक्रमात बोलतांना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या लांबलेल्या मंत्रीमंडळ विस्तारावर मिश्किल टीका केली.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला, पण अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात पूर, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, परंतु अद्याप पंचनामे आणि मदतीचा पत्ता नाही. (Maharashtra) राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार, विकासकामे सुरूच आहेत, जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेत आहोत, असा दावा करत आहेत.

या दाव्याचाच अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात समाचार घेतला. अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल विचारले की, लवकरच होणार, लवकरच होणार असं ते सांगतात, पण अरे बाबांनो तुमचा हा लवकर कधी लवकर येणार. नेमकी तुमची अडचण काय आहे ते तरी महाराष्ट्राला कळू द्या.

दिल्लीकडून परवनागी मिळत नाहीये का? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सरकारचे भवितव्य आहे, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाहीये का? की मग जे चाळीस आमदार शिंदे यांच्यासोबत आले त्यांना सगळ्यांना तुम्ही पद देण्याचे गाजर दाखवले आहे आणि आता तो शब्द तुम्हाला पुर्ण करता येत नाही, नेमकी तुमची अडचण काय आहे हे एकदा जनतेला कळू द्या, असा टोला देखील पवार यांनी लगावला.

Cm Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadanvis News
मुख्यमंत्री बांगरांच्या फार्म हाऊसचे उद्धाटन करणार, कावड यात्रेतही सहभागी होणार..

सचिवांना मंत्र्यांचे अधिकार देण्याचा निर्णयावर देखील अजित पवारांनी टीका केली. यावर फडणवीस यांनी सगळं माहित असून देखील अजित पवार राजकारणासाठी नुसती डायलाॅगबाजी करत असल्याचा पलटवार केला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतांना सचिवांना अधिकार देण्याचा नियम आहे, तो अजित पवारांनाही माहित आहे.

असा निर्णय यापुर्वी देखील घेतला गेलेला आहे. पण यांना राजकारण करायचे आहे, जनतेची कुठलीही कामे आम्ही थांबवलेली नाहीत. ती पुर्णपणे सुरू आहेत, विकासकामांना देखील कुठेही ब्रेक लागलेला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com